AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेट मिळाली, पण आशीर्वाद नाही, मनोज जरांगेंना भेटलेल्या सर्वपक्षीय नेत्यांचं काय होणार?; पाटलांचा एक घाव अनेक तुकडे

मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. तेव्हा अनेक प्रस्तापीत नेत्यांचे देखील धाबे दणाणल्याचं पाहयला मिळालं. अनेक बड्या नेत्यांनी या काळात जरांगे यांची भेट घेतली.

भेट मिळाली, पण आशीर्वाद नाही, मनोज जरांगेंना भेटलेल्या सर्वपक्षीय नेत्यांचं काय होणार?; पाटलांचा एक घाव अनेक तुकडे
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Nov 04, 2024 | 5:49 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर जरांगे पाटील ठाम होते. मात्र जरांगे पाटील यांची ही मागणी काही मान्य झाली नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बैद्ध, मुस्लिम आणि मराठा आशी मोट बांधण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज ऐनवेळी विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. तेव्हा अनेक प्रस्तापीत नेत्यांचे देखील धाबे दणाणल्याचं पाहयला मिळालं. त्याला कारण होतं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल. जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असं मानलं जातं. त्यामुळे जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याची घोषणा करताच दिग्गजांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या, यामध्ये सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून आलेले हसन मुश्रीफ असोत किंवा त्यांचे प्रतिस्पर्धी समरजित घाडगे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली. उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, राधाकृष्ण विखे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे या सारख्या अनेक बड्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेतल्या. अनेक नेते तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी इच्छूक होते.

मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र आता असा प्रश्न निर्माण होतो की याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार महाविकास आघाडी की महायुती, मात्र दुसरीकडे असंही दिसून येते की जरांगे फॅक्टर आधीच ओळखून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेक मतदारसंघात मराठा उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.  जरांगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा कोणाला फायदा होणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....