AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक राज्य 13,552 लोकांचं अपहरण, 9789 महिला गायब, धरणीने गिळल्या की आकाशात हरवल्या? सगळेच हादरले

कर्नाटकातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2020 पासून आतापर्यंत राज्यात 13,552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे.

एक राज्य 13,552 लोकांचं अपहरण, 9789 महिला गायब, धरणीने गिळल्या की आकाशात हरवल्या? सगळेच हादरले
Kidnapping
| Updated on: Aug 20, 2025 | 7:19 PM
Share

देशात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी खून मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी अपहरणाच्याही घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता कर्नाटकातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या राज्यातील अपहरण झालेल्या लोकांचा आकडा अनेकांसाठी धक्कादायक आहे. या आकडेवारीमुळे सरकारचीही चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाच वर्षांमध्ये 13552 लोकांचे अपहरण

कर्नाटक राज्यात अपहरणांच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2020 पासून आतापर्यंत राज्यात 13,552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 9789 महिला आहेत. तसेच 2025 च्या पहिल्या सात महिन्यांत राज्यात 1318 लोकांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. यातीस सर्वाधिक 589 लोक राजधानी बेंगळुरूमधून गायब झाले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे, त्यामुळे हा आकडा समोर आला आहे.

बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या

काही दिवसांपूर्वी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते आणि नंतर त्याची हत्या झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. तसेच तुमकुरु, मांड्या, चित्रदुर्ग आणि दावणगेरे जिल्ह्यांमध्येही अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील अपहरणांच्या घटना का वाढत आहेत? यामागे काय कारण आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहे. या घटना वाढल्यामुळे सरकारचीही चिंता वाढली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढल्या

कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी लहान मुलांच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘सध्या सीसीटीव्हीसारखे आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढत आहेत. याबाबत उपाय शोधण्यासाठी सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठका आयोजित करायला हव्यात असंही रवी यांनी म्हटलं आहे. आता सरकार अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.