AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक राज्य 13,552 लोकांचं अपहरण, 9789 महिला गायब, धरणीने गिळल्या की आकाशात हरवल्या? सगळेच हादरले

कर्नाटकातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2020 पासून आतापर्यंत राज्यात 13,552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे.

एक राज्य 13,552 लोकांचं अपहरण, 9789 महिला गायब, धरणीने गिळल्या की आकाशात हरवल्या? सगळेच हादरले
Kidnapping
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 20, 2025 | 7:19 PM
Share

देशात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी खून मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी अपहरणाच्याही घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता कर्नाटकातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या राज्यातील अपहरण झालेल्या लोकांचा आकडा अनेकांसाठी धक्कादायक आहे. या आकडेवारीमुळे सरकारचीही चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाच वर्षांमध्ये 13552 लोकांचे अपहरण

कर्नाटक राज्यात अपहरणांच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2020 पासून आतापर्यंत राज्यात 13,552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 9789 महिला आहेत. तसेच 2025 च्या पहिल्या सात महिन्यांत राज्यात 1318 लोकांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. यातीस सर्वाधिक 589 लोक राजधानी बेंगळुरूमधून गायब झाले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे, त्यामुळे हा आकडा समोर आला आहे.

बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या

काही दिवसांपूर्वी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते आणि नंतर त्याची हत्या झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. तसेच तुमकुरु, मांड्या, चित्रदुर्ग आणि दावणगेरे जिल्ह्यांमध्येही अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील अपहरणांच्या घटना का वाढत आहेत? यामागे काय कारण आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहे. या घटना वाढल्यामुळे सरकारचीही चिंता वाढली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढल्या

कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी लहान मुलांच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘सध्या सीसीटीव्हीसारखे आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढत आहेत. याबाबत उपाय शोधण्यासाठी सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठका आयोजित करायला हव्यात असंही रवी यांनी म्हटलं आहे. आता सरकार अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे