AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप रे! दोन आठवड्यात 15 प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू; अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दहशत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. (15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

बाप रे! दोन आठवड्यात 15 प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू; अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दहशत
Aligarh Muslim University
| Updated on: May 09, 2021 | 10:32 AM
Share

लखनऊ: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दोन आठवड्यातच कोरोनामुळे 15 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी मिळून विद्यापीठातील एकूण 40 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. (15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाशी संबंधित एका प्राध्यापकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एएमयू कायदा शाखेचे डीन प्रा. डॉ. मोहम्मद शकील अहमद समदानी यांचं एएमयूच्या जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना निधन झालं. दोन आठवड्यातच विद्यापीठातील 15 प्राध्यापकांचं निधन झालं आहे. प्राध्यापकांसह इतर कर्माचारी मिळून आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

विद्यापीठात दहशत

यूपीच्या जौनपूरचे राहणारे शकील समदानी यांनी यूपी बोर्डातून इयत्ता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर गोरखपूर विद्यापीठातून बीए केलं होतं. त्यानंतर त्यांनी अलिगढ विद्यापीठातूनही एलएलबी, एलएलएम आणि पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. रोज कोणत्या ना कोणत्या विद्यमान किंवा निवृत्त प्राध्यापकाच्या निधनावर विद्यापीठ प्रशासनाला शोक व्यक्त करावा लागत आहे. रोड कानावर पडणाऱ्या निधनाच्या वार्तेमुळे विद्यापीठात दहशत निर्माण झाली आहे.

कुलपतींचंही निधन

या महामारीत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलपती प्रा. तारीक मंसूर यांचंही निधन झालं आहे. विद्यापीठीतील संस्कृत विभागाचे माजी चेअरमन प्रा. खालिद बिन यूसूफ यांचंही काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झालं आहे. खालिद यांनी ऋग्वेदात पीएचडी केली होती. इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोमध्ये त्यांची कन्या इला आणि इब्रा यांनी भाग घेतला होता. पत्नीला व्हॉट्सअॅपवरून तलाक दिल्यामुळेही ते वादग्रस्त ठरले होते.

देशातील कोरोनाची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

संबंधित बातम्या:

तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली, मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra Coronavirus LIVE Update : पिंपरी चिंचवडमध्ये ‘रेमडेसिव्हीर’ काळ्या बाजारात विकताना तिघांना अटक

Corona Cases in India | एका दिवसात चार लाखाहून अधिक नवे कोरोनाग्रस्त, तब्बल 4092 कोरोनाबळी

(15 professors of AMU die of Covid in Uttar Pradesh)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.