AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा; अजूनही 168 सक्रीय दहशतवादी, पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती

यावर्षी जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 171 दहशतवादी मारले गेल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषेदत दिली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाण शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.

वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा; अजूनही 168 सक्रीय दहशतवादी, पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 6:47 AM
Share

श्रीनगर : यावर्षी जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 171 दहशतवादी मारले गेल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या वर्षी एकूण 171 दहशतवादी चकमकीमध्ये ठार झाले. त्यापैकी 19 दहशतवादी हे पाकिस्तानी तर 152 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. 2020 ला जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये एकूण 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2021 ला एकूण 34 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दहशतवादी संघटनांच्या मोहरक्यांचा खात्मा

ते पुढे बोलताना म्हणाले की, या वर्षी जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवांना मोठे यश मिळाले आहे. जवळपास सर्वच दहशतवादी गंटांच्या मोहरक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. त्यामधे उत्तर काश्मीरमध्ये 65, मध्य काश्मीरमध्ये 16 आणि दक्षिण काश्मीरमध्ये 87 एसे एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. 13 डिसेंबर रोजी झालेल्या झेवान दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पोलिसांचे दहशतवाद्यांकडे बारीक लक्ष असून, राज्यातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

अमली पादार्थ प्रकरणात 1465 जणांना अटक

दरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये सध्या अमली पदार्थ्यांच्या तस्करीचे प्रकरणे वाढले असल्याची माहिती देखील यावेळी विजय कुमार यांनी दिली. अमली पदार्थ्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना राबवत आहोत. आतापर्यंत अमली पदार्थ तस्करी प्रकरणात 815 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून, एकूण 1465 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

संबंधित बातम्या

Last sunset of the year 2021 : मावळतीच्या सूर्याचं रूप मोबाइमध्ये टिपत सरत्या वर्षाला निरोप, पाहा Photos

लहान मुलं कोव्हिडच्या विळख्यात, प्रत्येक जिल्हात हवं स्वतंत्र रुग्णालय, 81% भारतीयांची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.