AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIHAR NEWS | एकाच दिवसात २२ लोकांचा बुडून मृत्यू, लोकांची वेगळीचं चर्चा

एकाचं दिवसात २२ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ही घटना एका राज्यात घडली आहे. नऊ जिल्ह्यातील लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

BIHAR NEWS | एकाच दिवसात २२ लोकांचा बुडून मृत्यू, लोकांची वेगळीचं चर्चा
biharImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2023 | 10:35 AM
Share

बिहार : एकाच दिवसात २२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नदी आणि तलावात बुडून लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिहार (bihar) राज्यातील असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार बिहार राज्यातील २२ (22 people death) लोकांचा २४ तासात मृत्यू झाला आहे. पोहत असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. ९ जिल्ह्यातील लोकांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार ज्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार (bihar cm nitish kumar) यांना समजला त्यावेळी त्यांनी सुध्दा दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना ४ लाख देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे.

राज्यात मोठ्या उत्साहात सण सुरु असताना ही घटना घडली आहे. सगळ्यात जास्त मृत्यू हे भोजBIJपूर जिल्ह्यातील आहेत. बहियारा जिल्ह्यात सेल्फीच्या नादात पाच मुली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्या. नदीच्या काठावर असलेल्या महिलांनी आरडाओरड केली, परंतु लोकांना तिथं पोहोचायला उशीर झाला. पाचही मुलींचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर केलेल्या माहितीनुसार अलावा जहानाबाद या जिल्ह्यात सुध्दा चार लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पटना आणि रोहतास या जिल्ह्यात तीन-तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. दरभंगा आणि नवादा जिल्ह्यात दोन-दोन लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. कैमूर, मधेपुरा आणि औरंगाबाद या जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

राज्यात महिला जीवितपुत्रिका सण मोठ्या आनंदात साजरा करतात. त्या महिला आपली मुलं आणि पती यांच्या दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून उपवास ठेवतात. उत्सव सुरु असताना मृत्यू झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या परिसरात स्मशान शांतता पसरली होती. भोजपूर जिल्ह्यात एका गावातील पाच मुली बुडाल्याने संपूर्ण गाव शांत झालं होतं.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.