AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाकडून ११ दिवसात २५ जणांना स्मशानापर्यंत खांदा, आता त्याचे थकलेले पाय फक्त बॅटरीच्या बाहुल्यांसारखे प्रेतयात्रेत चालतात

आतापर्यंत ११ दिवसात २५ अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण जीवनासाठी हा मोठा धक्का आहे, आतापर्यंत ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर गावातील मंडळी देखील या लग्नात सहभागी झाली होती.

नवरदेवाकडून ११ दिवसात २५ जणांना स्मशानापर्यंत खांदा, आता त्याचे थकलेले पाय फक्त बॅटरीच्या बाहुल्यांसारखे प्रेतयात्रेत चालतात
| Updated on: Dec 20, 2022 | 7:47 PM
Share

जयपूर : तो घोड्यावर बसण्याआधी सर्व नवरदेव लग्नाच्या रंगात रंगतात, तसाच पुढची स्वप्न पाहत होता. नवरदेवाला सजवलं जात होतं, नवरी देखील काही क्षणात मंडपात पोहोचेल, असे मंगलमय, दोन जीव एकत्र येतील, ते देखील सर्वांच्या साक्षीने असा क्षण आला होता. नवरदेवाचे आईवडील, बहिणी, भाऊ, लहान भाचे, नवे कपडे घालून लग्नासाठी तयार होते. घरात लग्नाचा उत्साह आणि लगबग सुरु होती.जेवणाचा खमंग सुगंध येत होता. लग्नानंतर पंगतीत पोटपूजा होणार होती. पण नियतीला यापुढे या घरात आणि लग्नात आलेल्या लोकांच्या आयुष्यातील एकही आनंदाचा क्षण मान्य नव्हता. यानंतर अशी घटना घडली जी कुणाच्याही आयुष्यात ती देखील लग्नाच्या वेळी कधीच घडू नये.

पण अचानक नियतीने काही लोकांच्या आयुष्यावर हल्ला केला. लग्नमंडपाच्या बाजूला असलेल्या सिलेंडरमधून एक सिलिंडर लिक झालं आणि त्याने पेट घेतला. त्यासोबत आणखी सिलिंडर पेटले. धडाधड आवाज होत गेले, किंचाळण्याचा आवाज झाला, कुणालाही काही कळत नव्हतं की नेमक्या एवढ्या उष्ण आणि क्षणात भाजून काढणाऱ्या ज्वाळा कुठून आल्या.

या पेटत्या सिलिंडरच्या ज्वाळा लहान मुलं, म्हातारी माणसं, ते सर्वांनाच भाजून काढत होत्या, आख्खं घर पेटलं. आग विझवण्याचा प्रयत्न सुरुच होता, एक सिलिंडर उडून लग्न मंडपात देखील आलं. काही लोकांनी सिलिंडर जे चांगले होते ते बाजूला क उतर काही लोकांनी काही तासानंतरही आग विझवण्यात आली, पण सर्वांनी जवळच्या लोकांना गमावलं, जागच्या जागी होरपळून ८ जण ठार झाले, तर २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नवरदेव हा या घटनेवर काहीही बोलत नाही, त्याचे अश्रू वाहण्याआधीच सुकले आहेत, अश्रू पुसायला, समजूत घालायला, सोबत रडायलाही कुणी नाही. ज्या जखमींचं निधन झालं, त्यांची अंत्ययात्रा निघते, प्रेतयात्रेत खांदा देणारा एक नवरदेव असतोच.

रोज दोन ते ३ प्रेत यात्रा, नवरदेव आता मनानंतर शरीरानेही थकलाय. पण हे चक्र अजून थांबत नाहीय. जयपूरमध्ये हॉर्सरायडिंगचं नवरदेव सांगसिंग काम करत होता.त्याला माहित नव्हतं लग्नाच्या बाबतीत त्याचं नशीब एवढं वाईट असेल.

या घटनेत आतापर्यंत ३५ लोकांचा जीव गेलाय. यापैकी १० जण हे बाहेरचे आहेत. बाहेरचे अनेक येतात, नवरदेवाला आधार देण्याचा प्रयत्न करतात, पण तो एकटक सर्वांकडे पाहत असतो.तो समजूच शकत नाहीय, नियतीने हा कोणता कठीण वार केला.

या घटनेत नवरदेवाने आई, पुतण्या, भाऊ यांना गमावलं, काहींनी आईवडील, काहींनी भाऊ बहिण तर काहींनी बहिणीला गमावलं.ही घटना ८ डिसेंबर २०२२ रोजी घडली. राजस्थानातील भुंगरा या गावात ही घटना घडली. जोधपूरपासून ११० किमीवर हे गाव आहे.

आतापर्यंत ११ दिवसात २५ अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण जीवनासाठी हा मोठा धक्का आहे, आतापर्यंत ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर गावातील मंडळी देखील या लग्नात सहभागी झाली होती.

या घटनेने काही अंगणातील किलबिल संपली, काहींना आजीआजोबा गेले, तर काही घरातील कर्ते पुरुष गेले, तर काहींच्या घरात कुणीच उरलं नाही. काहींचे आईबाबाच गेले. सिलिंडर ही प्रत्येक कार्य़क्रमात वापरली जाणारी वस्तू असली, तरी ती अधिक सुरक्षित आणि काळजी पूर्वक ठेवण्याची वस्तू आहे हे समजून घ्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.