AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ” खरं बोलणारी लोकं…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले,  खरं बोलणारी लोकं...
राहुल गांधी यांना दिलासा मिळताच आदित्य ठाकरे सुनावले खडेबोल, आता लोकसभेत...
| Updated on: Aug 04, 2023 | 8:24 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मोदी आडनावावरून केलेलं वक्तव्य राहुल गांधी यांना भोवलं होतं. तसेच या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. अखेर सुप्रीम कोर्टाने शिक्षेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या कोलारमध्ये एका निवडणूक सभेत राहुल गांदी यांनी भाषणात सांगितलं होतं की, ‘सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं असतं?’. या वक्तव्याप्रकरणी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होतं. तसेच दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन दिला होता. तसेच अपील करण्यासाठी वेळ देत शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित केली होती. या प्रकरणी भाजपा विरोधी पक्षांनी रान उठवलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे.

“मला वाटतं हा आदेश योग्य आहे. जर तुम्ही निकालाकडे पाहिलं तर कळेल की खूप महत्त्वपूर्ण आहे. आता खरं बोलणारे लोकं लोकसभेत पुन्हा येणार आहेत. या देशात तिरस्कार आणि सूडाचं राजकारण जिंकू शकत नाही. आम्ही या आदेशाचं स्वागत करतो. “, असं आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

दुसरीकडे, राहुल गांधी यांना दिलासा मिळाल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनीही आनंद व्यक्त केला आहे. “आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आम्हाला आमच्या देशाच्या न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे. अशा निर्णयामुळे देशातील जनता खूश होईल. न्यायपालिकांवर सरकारचा दबाव नसल्याचं यातून स्पष्ट होईल”, असं रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलं.

काय झालं होतं नेमकं या प्रकरणात?

राहुल गांधी यांना दोषी धरताच त्यांचं  24 मार्च 2023 रोजी लोकसभा सदस्यत्व गेलं होतं. त्यानंतर 3 एप्रिलला शिक्षेविरोधात सूरत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका फेटाळत निकाल कायम ठेवण्यात आला. त्यानंतर गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली. पण तिथेही निकाल विरोधात गेल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सुनावणी घेत मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. तसेच लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.