.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उष्णतेच्या लाटेचा कहर, 10 दिवसात एवढ्या लोकांचा जीव गेला, पण आता

कडाक्याच्या गरमीमुळे जिल्हा रुग्णालयात गेल्या 10 दिवसांत अनेक रुग्णांचा जीव गेला असून आता परिस्थिती हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र असे असले तरी रुग्णांच्या संख्येत मात्र वाढच होत आहे.

उष्णतेच्या लाटेचा कहर, 10 दिवसात एवढ्या लोकांचा जीव गेला, पण आता
| Updated on: Jun 21, 2023 | 10:55 AM
Share

लखनऊ : आषाढ महिना सुरू झाला तरी पावसाचे काहीच नामोनिशाण दिसत नसून देशातील बऱ्याच भागात अद्यापही कडाक्याचा उन्हाळाच (hot summer) आहे. उत्तर प्रदेशमध्येही सध्या उन्हाचा कडाका वाढत असून त्याचा परिणाम लोकांच्या तब्येतीवर होताना दिसत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बलिया येथील जिल्हा रुग्णालयात (hospital) 10 दिवसांमध्ये 100 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले असून आता हळूहळू परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र असे असले तरी रुग्णांच्या संख्येत मात्र वाढच होत आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयात विविध आजारांनी ग्रासल्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वातावरणातील उष्णता वाढल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. गेल्या 24 तासांत रुग्णालयात 180 रुग्ण दाखल झाले आहेत.

एवढेच नव्हे तर रुग्णालयात 250 हून अधिक खाटा भरलेल्या असून सर्व वॉर्डांमध्ये व्यवस्था अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच संसाधनेही वाढवली जात आहेत. वाढत्या उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रत्येक वॉर्डात एसी बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केली रुग्णालयाची पाहणी

जिल्हा दंडाधिकारी रविंद्र कुमार यांनी मंगळवारी सकाळी रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तर दुसरीकडे शासन स्तरावरून तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील अधिकाऱ्यांनी ग्रामीण क्षेत्रातील विविध भागांची तपासणी करून हीट व्हेव संदर्भात माहिती गोळा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तापमानात तर वाढ होत आहेच, पण ग्रामीण क्षेत्रातील विविध भागांत होणाऱ्या वीज कपातीमुळेही ( आजारी पडण्याची) ही समस्या वाढताना दिसत आहे.

एका आठवड्यापूर्वी रुग्णांच्या अकस्मात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सीएमएस डॉ. दिवाकर सिंह यांची शासनस्तरावरून बदली करण्यात आली होती. उष्माघातामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या अनेक बातम्या समोर येत असतानाच, विविध आजारांमुळे ग्रस्त असलेल्या बहुतांश वृद्ध नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. वातावरणातील गरमी किंवा उष्णता वाढल्याने रोगांचा प्रभावही वाढू शकतो.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर