AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam attack : दाढी वाढवली होती म्हणून वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव

पहलगाम हल्ल्यातून आसाममधील एक कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या देबाशीष भट्टाचार्य यांनी आपला भयावह अनुभव सांगितला आहे.

Pahalgam attack : दाढी वाढवली होती म्हणून वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 7:43 PM
Share

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेत आसाममधील एक कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या देबाशीष भट्टाचार्य यांनी आपला भयावह अनुभव सांगितला आहे.

या हल्ल्याबाबत बोलताना देबाशीष भट्टाचार्य यांनी सांगिलं की, ते आणि त्यांची पत्नी आसाम विश्वविदालयाच्या बंगाली भाषेच्या विभागात कार्यरत आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेले होते, त्याचवेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही देखील तिथेच होतो. हा हल्ला झाला तेव्हा आम्ही एका झाडाच्या अडोशाला लपलो होते. तेव्हा मला तिकडे दिसलं की काही लोक कलमाचं पठण करत आहेत, तेव्हा मी देखील त्या लोकांमध्ये सहभागी झालो.

त्यावेळी एक दहशतवादी माझ्यासमोर आला आणि त्याने मला विचारलं इथे तू काय करतोय, तू काय म्हणत आहेस? रामाचं नाव घेत आहेस का? त्यावेळी मी जोर जोराने कलमा म्हणून लागलो. खरं पाहाता मला पूर्ण कलमा येत नव्हता. मात्र त्या दहशतवाद्याने माझ्याकडे फार काही लक्ष दिलं नाही आणि माझा जीव वाचला. मी दाढी देखील वाढवली होती, आणि कलमाचे देखील पठण केले त्यामुळे माझा जीव वाचला, तो दहशतवादी माझ्यापासून दूर चालला गेला असं देबाशीष यांनी म्हटलं आहे.

देबाशीष यांच्या पत्नी मधुमिता दास यांचे बंधू नबेंदू दास यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं की, सुदैवानं दाढी असल्यामुळे दहशतवादी त्यांना ओळखू शकले नाही, त्यामुळे देबाशीष यांचा जीव वाचला. देबाशीष भट्टाचार्य, त्यांची पत्नी मधुमिता दास भट्टाचार्य आणि त्यांचा मुलगा द्रौदीप भट्टाचार्य हे सर्व सुरक्षीत असून, ते श्रीनगरमध्ये आहेत, अशी माहिती नबेंदू दास दिली आहे. या हल्ल्यानंतर आता जम्मू -काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.