AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत होणार मतदान; जाणून घ्या अपडेट

संपूर्ण देशात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर गेले होते. आता या निवडणुकीच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 'या' तारखेपर्यंत होणार मतदान; जाणून घ्या अपडेट
Bihar Election date
| Edited By: | Updated on: Oct 14, 2025 | 5:40 PM
Share

संपूर्ण देशात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात आयोगाने विविध राजकीय पक्षांसोबत बैठका घेतल्या. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, बिहारमधील एसआयआर पूर्णपणे यशस्वी झाला आहे. तसेच बिहारमधील निवडणुका 22 नोव्हेंबरपूर्वी होतील अशी घोषणाही त्यांनी केली.

बूथवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी खास नियोजन

ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदारांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासाठी आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बूथवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही बूथवर 1200 पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. आता बूथवर मोबाईल फोन नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिंग एजंटना बूथ सेंटरपासून 100 मीटर अंतरावर बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उमेदवारांचे रंगीत छायाचित्र असणार

पुढे बोलताना ज्ञानेश कुमार म्हणाले की, EVM मशीनवर उमेदवारांचे रंगीत छायाचित्र असेल. तसेच सर्व बूथवर निवडणूक प्रक्रिया लाईव्ह-स्ट्रीम केली जाईल. मतदार यादीतील सर्व माहिती स्पष्ट दिलेली असेल. निवडणूक आयोगाने वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे जो जनतेला सर्व प्रकारची माहिती देईल. बिहारमध्ये एसआयआर पूर्णपणे यशस्वी झाला आहे. आता बिहारनंतर तो देशभरात राबविला जाणार आहे.

मतदारांचा घर क्रमांक शून्य का आहे?

मतदार यादीत एकाच घर क्रमांकावर अनेक मतदारांची नावे आहेत, तसेच काहींचा घर क्रमांक शून्य असा आहे. यावर बोलताना निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, अनेक लोकांकडे घरे नाहीत. म्हणूनच त्यांचे घर क्रमांक शून्य असे लिहिले आहेत. जर कोणत्याही पक्षाला असे वाटत असेल की कोणताही पात्र मतदार वगळण्यात आला आहे किंवा यादीत अपात्र मतदार आहेत, तर ते त्यासाठी अर्ज करू शकतात.

मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज बिहारच्या जनतेला आगामी निवडणूकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. बिहार दौऱ्यात ज्ञानेश कुमार यांच्यासोबत एस.एस. संधू आणि विनीत जोशी हे अधिकारी हजर होते.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.