AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तेजस्वीने घरातून हाकलले… प्रश्न विचारल्यास चप्पलने… रोहिणी आचार्य यांचा गंभीर आरोप

Rohini Acharya : लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आता रोहिणी यांनी भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मला तेजस्वीने घरातून हाकलले... प्रश्न विचारल्यास चप्पलने... रोहिणी आचार्य यांचा गंभीर आरोप
Rohini acharya and tejaswi yadav
| Updated on: Nov 15, 2025 | 10:56 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आता रोहिणी यांनी भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहिणी यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

रोहिणी आचार्य यांचा गंभीर आरोप

आज दुपारी सोशल मीडियाद्वारे राजकारण सोडण्याची घोषणा केल्यानंतर सायंकाळी रोहिणी या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना रोहिणी यांनी, ‘माझे कोणतेही कुटुंब नाही. आता संजय, रमीज आणि तेजस्वी यादव यांना जा आणि विचारा. या लोकांनी मला घराबाहेर काढले. त्यांना पराभवाची जबाबदारी घ्यायची नाहीये. जो चाणक्य होईल त्याला प्रश्न विचारला जाईल. पक्षाची ही अवस्था का झाली असा प्रश्न कार्यकर्ते चाणक्य यांना प्रश्न विचारत आहेत. तुम्ही संजय, रमीज आणि तेजस्वी यादव यांचा उल्लेख केला तर तुम्हाला घराबाहेर काढले जाईल. तुमची बदनामी केली जाईल. तुम्हाला शिवीगाळ केली जाईल आणि चप्पलांनी मारहाण केली जाईल.’ असा गंभीर आरोप केला आहे.

राजकारण सोडण्याची घोषणा

आरजेडीचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर रोहिणी यादव यांनी राजकारण आणि कुटुंब सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत ट्वीट करताना रोहिणी म्हणाल्या होत्या की, ‘मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करायला सांगितले आहे.’ त्यानंतर आता रोहिणी यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत.

रोहिणी संजय यादववर नाराज का आहेत?

लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यापासून रोहिणी आचार्य संजय यादववर नाराज आहेत. तेज प्रताप यादव देखील पक्षातून आणि कुटुंबातून बाहेर पडण्यासाठी संजय यादव म्हणजे जयचंद यांना जबाबदार धरत आहेत. रोहिणी यांच्या मते संजय यादव हे पक्षाचे नेते व कार्यकर्ते आणि तेजस्वी यादव यांच्यात अडथळा आहेत. त्यामुळेच रोहिणी त्यांच्यावर नाराज आहेत.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.