AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिकारी खुद शिकार ना हो जाए, 70 वर्षांनी भारतात चित्ते, यंत्रणेला सतावतेय ही भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्या नामिबियातून 8 चित्ते भारतात येत आहेत. मात्र संपूर्ण यंत्रणेला एक भीती सतावत आहे.

शिकारी खुद शिकार ना हो जाए, 70 वर्षांनी भारतात चित्ते, यंत्रणेला सतावतेय ही भीती
90 टक्के चित्ते लहान असतानाच इतर प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतातImage Credit source: social media
| Updated on: Sep 16, 2022 | 6:00 PM
Share

नवी दिल्लीः तब्बल सात दशकांनंतर भारतात चित्त्याचं (Cheetah) दर्शन होणार आहे. 70 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतीय जंगलांतून (Indian Forest) लुप्त झाला होता. आता नामिबियातून (Namibia) उद्या 8 चित्ते भारतात आणले जात आहेत. अनेक प्राणी आणि निसर्गप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण आशिया खंडासाठीच या निमित्ताने आशादायी संकेत मिळत आहेत. कारण आशिया खंडात सध्या फक्त 12 चित्ते आहेत. भारतात आलेले चित्ते येथे स्थिरावले आणि त्यांची संख्या वाढली तर हे खूप मोठं यश समजलं जाईल. पण या चित्त्यांबाबत एक भीतीदेखील आहे.

जंगलात चित्त्यांचे शत्रू कोण?

चित्ता एक चपळ प्राणी आहे. मात्र जंगलात त्याचे खूप शत्रू असतात. वाघ, बिबट्या, लांडगे हे चित्त्याच्या मागावर असतात. संधी दिसताच ते चित्त्यावर डाव साधतात. चित्त्याच्या शावकांना तर जंगली कुत्रीही सहज खातात.

95 टक्क्यांपेक्षा जास्त चित्ते लहानपणीच जंगलात मारले जातात, असं म्हणतात. 70 टक्के चित्ते 3 महिन्यांचे व्हायच्या आतच मारले जातात. चित्त्यांची संख्या कमी होण्यामागचं एक मोठं कारण हेदेखील आहे. सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीजचे डायरेक्टर उल्लास कारंथ यांनी नॅशनल जिओग्राफिकशी बातचित केली. ते म्हणतात, चित्ते आणायला हरकत नाही. पण अचानकपणे चित्ते ७० वर्षानंतर माणसांच्या जंगलात सोडले जाणार, हे पचणं जरा कठीण जाऊ शकतं..

‘बांधून ठेवता येणार नाही’

हे चित्ते मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये बांधून ठेवता येणार नाहीत. मात्र जंगलाच्या बाहेर त्यांच्यासाठी धोका असू शकतो. रस्ता चुकून ते दूर गेले तर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते. या चित्त्यांवर 24 तास लक्ष ठेवण्याचं आव्हान आहे.

चित्त्यांची शिकार झाली नाही तरी ते स्वतःच उपासमारीने मरू शकतात. आपल्यापेक्षा कमी शक्तीशाली आणि कमी वजनाच्या प्राण्यांचीच ते शिकार करतात. त्यामुळेच वाघ, सिंह, बिबट्यांसारखे प्राणी त्याची शिकार करतात.

आपल्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं या प्राण्याला सहन होत नाही. उल्हास कारंथ म्हणतात, 2009 मध्ये भारतात चित्ते आणण्यावर अनेकांची सहमती नव्हती. मात्र पर्यावरण मंत्र्यांना काहींनी या प्रकल्पाची भुरळ घातली.

एकदा का चित्ते बाहेर आले तर बाहेरील गावं, शेत आणि कुत्र्यांच्या जीवावर बेतू शकतं. पण चित्त्यांच्या मानेत कॉलर लावल्याचा तर्क प्रशासनातर्फे देण्यात येतोय.

एकूणच या मतभेदांनंतरही उद्या 8 चित्ते भारतात येत आहेत. काही काळानंतर या आरोप-प्रत्यारोप आणि भीतींतील वास्तविकता समोर येईल.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.