AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर 36 मीटर उंच पुलाची निर्मिती, 12 मजली इमारती इतकी उंची

या साबरमती पुलाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे. सर्व पाया आणि पिलरची संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून पुलाच्यावरील भागाची कामे, ज्यात खांबाच्या ( व्हायडक्ट )शिरोभागाचे बांधकाम आणि विभागांचे (सेगमेंट्सचे) कास्टिंग यांचा समावेश आहे , ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर 36 मीटर उंच पुलाची निर्मिती, 12 मजली इमारती इतकी उंची
Mumbai-Ahmedabad Bullet Train Bridge
| Updated on: Aug 01, 2025 | 7:14 PM
Share

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. या हायस्पीड मार्गावर सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर मोठा पुल बांधला जात आहे. या पुलाची उंची 36 मीटर असून म्हणजेच सुमारे 12 मजली इमारतीची उंची भर इतका (अंदाजे 118 फूट) हा पूल उंच आहे.एकूण 480 मीटर लांबीचा हा पूल, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची मीटरमध्ये सुमारे 14.8 मीटर इतकी आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो एक इंजिनियरिंगचा चमत्कार ठरणार आहे.

अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उड्डाणपूल, पूल, रेल्वे मार्ग आणि मेट्रो कॉरिडॉर यांसारख्या अनेक इन्फास्ट्रक्चर मधून बांधला जात आहे. भारतीय महामार्ग काँग्रेसच्या (आय.आर.सी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्वाधिक उंचीच्या बांधकाम बिंदूपासून 5.5 मीटर इतके अनिवार्य उभे अंतर राखण्यासाठी, साबरमती नदीवरील पुलाचे खांब वाढीव उंचीने तयार करण्यात आले आहेत.

असे होत आहे बांधकाम –

36-meter high bridge over the Sabarmati River

या पुलावर एकूण आठ (08) गोलाकार खांब असणार असून ते 6 ते 6.5 मीटर व्यासाचे बांधले जात आहेत. यापैकी चार खांब नदीच्या पात्रात, दोन खांब नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूला एक) आणि दोन खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले आहेत. नदीच्या प्रवाहात अडथळा कमीत कमी राहावा यासाठी पुलाची रचना ठरवून करण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पूल सुमारे 40 मीटर लांबीच्या छोट्या स्पॅनवर आधारित असलेले आहेत.  तरी नदीच्या पात्रातील खांबांची संख्या कमी करण्यासाठी या पुलामध्ये 50 ते 80 मीटर लांबीच्या मोठ्या स्पॅनचा वापर करण्यात आला आहे.

या पुलामध्ये प्रत्येकी 76 मीटर लांबीचे 5 स्पॅन आणि प्रत्येकी 50 मीटर लांबीच्या 2 स्पॅनचा समावेश आहे. प्रत्येक स्पॅनमध्ये 23 विभाग (सेगमेंट) असून ते सर्व ऑन-साईट (स्थळावरच) बांधकामाच्या पद्धतीने कास्ट केले जात आहेत. हा पूल बॅलन्स्ड कँटीलिव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहे, हे एक विशेष बांधकाम तंत्र असून, जे खोल पाण्यातील आणि नद्यांवरील दीर्घ अंतराच्या पुलांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये:

• पुलाची एकूण लांबी – 480 मीटर

• नदीची रूंदी – 350 मीटर

• पुलामध्ये 76 मीटर लांबीचे 5 गप्पा आणि 50 मीटर लांबीचे 2 गप्पांचा समावेश

• खांबांची उंची – 31 मीटर ते 34 मीटर

• 6 मीटर व 6.5 मीटर व्यासाचे 8 गोलाकार खांब

• हा पूल साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान बांधला जात आहे

• साबरमती स्थानकापासून सुमारे 01 किमी आणि अहमदाबाद स्थानकापासून सुमारे 04 किमी हे अंतर आहे.

• हा पूल भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवर बांधण्यात येत आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.