AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीचा बाजार उठला? आता ‘या’ नेत्याचा स्वबळाचा नारा

भाजप आणि मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली. त्यामुळे भारत विरुद्ध इंडिया आघाडी असा लोकसभा निवडणुकीत सामना होईल असं सांगितलं जात होतं. पण लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच इंडिया आघाडीत फूट पडली आहे. एक एक करून बहुतेक राजकीय पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडले असून त्यांनी वेगळी वाट धरली आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीचा बाजार उठला? आता ‘या’ नेत्याचा स्वबळाचा नारा
Farooq AbdullahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2024 | 4:37 PM
Share

नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2024 : इंडिया आघाडीला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. आणखी एक पक्ष इंडिया आघाडीपासून दूर झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर उत्तर प्रदेशात जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आता नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अब्दुल्ला यांनी तर एनडीएसोबत युती करण्याचे संकेतही दिले आहे. त्यामुळे इंडिआ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीची अवस्था आता बिछडे सब बारी बारी… अशी झाली आहे.

फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर येथे बोलताना हे संकेत दिले आहे. जम्मू काश्मीरचे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकसाथ होतील असं मला वाटतं. सीट शेअरिंगबाबत बोलायचं झालं तर नॅशनल कॉन्फ्रन्स स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यात काहीच शंका नाही, असं फारूख अब्दुल्ला यांनी सांगितलं. त्यामुळे अब्दुल्ला यांच्या विधानाने खळबळ उडाली असून इंडिया आघाडीतून अब्दुल्ला बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.

मला देश कायम आणि एकसंघ ठेवण्यासाठी जे करायचं ते मी करेन. आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. भविष्यात एनडीएसोबत जाण्याच्या शक्यतेला आम्ही नाकारू शकत नाही. इंडिया आघाडीत जागा वाटपावरून चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ममता बॅनर्जीचा एकला चालो रे…

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची आधीच घोषणा केलेली आहे. आधी टीएमसीने काँग्रेसला पश्चिम बंगालमधून दोन जागा घेण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यावरून काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी 42 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

पंजाबमध्ये आप स्वबळावर

आम आदमी पार्टीने पंजाबमधील 13 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपने आधी काँग्रेसला सहा जागांची ऑफर दिली होती. मात्र, त्यानंतर चर्चा झाली आणि चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही. दिल्लीत आपने काँग्रेसला अवघी एकच जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने दिल्लीबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, नाही तर आम्ही सातही जागांवर उमेदवार देऊ, असं आपने म्हटलं आहे.

जयंत चौधरींचा सवतासुभा

उत्तर प्रदेशातही इंडिया आघाडी संकटात आहे. जयंत पाटील यांची राष्ट्रीय लोकदल इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे. चौधरी यांनी एनडीएला साथ दिली आहे. तर समाजवादी पार्टीने काँग्रेसला फक्त 11 जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेसने अजून काहीच भूमिका घेतलेली नाही.

Follow Us
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद