AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 1500 लोकांना घेतलं ताब्यात, चौकशी सुरू

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधून तब्बल 1500 जणांना तब्यात घेण्यात आलं आहे, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 1500 लोकांना घेतलं ताब्यात, चौकशी सुरू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 9:49 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा एजन्सीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधून 1500 पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या लोकांना काश्मीरच्या संवेदनशील भागांमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांचा समावेश आहे.

दहशतवादी प्रकरणाशी संबंधित प्रकरणात यापूर्वी ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, अशा लोकांचा यामध्ये समावेश आहे. या दहशतवाद्यांना ज्यांनी आश्रय दिला होता, त्यांचा शोध देखील सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. संशयित लोकांची चौकशी सुरू आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांकडून छापेमारी सुरू आहे, या हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्सचा शोध सुरू करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांना कोणी अश्रय दिला होता, त्यांना शस्त्र कोणी पुरवली याचा शोध आता घेण्यात येत आहे. सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

वीस लाखांच्या बक्षीसाची घोषणा

दरम्यान जम्मू -काश्मीर पोलिसांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. पोलिसांकडून या हल्लोखांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला थेट इशारा देण्यात आला आहे. असल्या भ्याड हल्ल्याला भारत घाबरत नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर दिलं जाईल की संपूर्ण जग बघत राहील, जे पडद्यामागचे सूत्रधार आहेत, त्यांना देखील शिक्षा होणार असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये बंदची हाक

दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी संचारबंदी सदृश्य परिस्थिती होती. सुरक्ष यंत्रणांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीरमधील काही जणांना तब्यात घेतलं आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.