जुनं प्रेम आठवलं, नवरदेवाचा बाप नवरीच्या आईसोबत पळाला!

गुजरातमधील एक अनोखं प्रेम प्रकरण समोर आलं आहे. येथे होणारे विहिण आणि व्याही आपल्या मुलांच्या लग्नापूर्वी स्वत:च पळून गेले.

जुनं प्रेम आठवलं, नवरदेवाचा बाप नवरीच्या आईसोबत पळाला!
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 3:26 PM

गांधीनगर : गुजरातमधील एक अनोखं प्रेम प्रकरण समोर आलं आहे. येथे होणारे विहिण आणि व्याही आपल्या मुलांच्या लग्नापूर्वी स्वत:च पळून गेले. या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा सुरु आहे. सुरत येथील 48 वर्षीय राकेश (बदललेलं नाव) यांच्या मुलाचं लग्न 46 वर्षीय आरती (बदललेलं नाव) यांच्या मुलीशी होणार होतं. येत्या फेब्रुवारी महिन्यात हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आपल्या मुलांच्या लग्नापूर्वीच राकेश आणि आरती पळून गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत हे दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

राकेश हे सुरतच्या कतारगाममध्ये राहतात. आरती या कतारगाममध्ये राकेश यांच्या शेजारीच राहायच्या, अशी माहिती आहे. हे दोघे अनेक काळापासून एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर आरती यांचं लग्न नवसारी येथील हीरा कारागिराशी झालं. बऱ्यााच कालावधीनंतर राकेश आणि आरती हे एकमेकांना भेटले ते विहिण आणि व्याही म्हणून. राकेश यांचा मुलगा आणि आरती यांच्या मुलीचं लग्न जुळलं.

लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. मात्र, या दरम्यान राकेश आणि आरतीला त्यांचं जूनं प्रेम आठवलं आणि ते कुणाचीही पर्वा न करता पळून गेले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे.

To Be In Laws Elope In Surat

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.