AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC परीक्षेतून नाही तर बिजनेस स्कूलमधून निवडा IAS-IPS, नारायणमूर्ती यांचा नेमका काय सल्ला?

NR Narayana Murthy: यूपीएससीमधील सध्याचा पॅटर्न हा 1858 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची अपील करत त्यांनी म्हटले, मला आशा आहे की भारत केवळ प्रशासन प्रमुख व्यवस्थेमध्ये न राहता व्यवस्थापनाभिमुख व्यवस्थेत असेल.

UPSC परीक्षेतून नाही तर बिजनेस स्कूलमधून निवडा IAS-IPS, नारायणमूर्ती यांचा नेमका काय सल्ला?
Narayana Murthy
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 19, 2024 | 7:01 AM
Share

NR Narayana Murthy Suggestion: संघ लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणारी आयएएस आणि आयपीएसची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेसाठी लाखो तरुण तयारी करतात. परंतु यश मात्र मोजक्या लोकांना मिळणार आहे. इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. आयएएस आणि आयपीएसची निवड यूपीएससीकडून नाही तर मॅनेजमेंट स्कूलमधून करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल. दोन दिवासांपूर्वी 70 तास काम करण्याच्या वक्तव्यावर आपण अजूनही ठाम असल्याचे नारायण मूर्ती यांनी सांगितले होते.

काय आहे नारायणमूर्ती यांचा सल्ला

नारायण मूर्ती यांनी म्हटले की, बिझनेस स्कूल किंवा मॅनेजमेंट स्कूलमधून ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल, त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमीत प्रशिक्षण दिले जावे. त्या ठिकाणी त्यांना कृषी, संरक्षण, उत्पादन या क्षेत्रासंदर्भात प्रशिक्षण दिले जावे. यामुळे सामान्य प्रशासक बनवण्याच्या विद्यामान पद्धतीपेक्षा हे सर्व वेगळे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे आता सरकारमध्ये प्रशासकाऐवजी मॅनेजर हवे का? या बाबत विचार करण्याची गरज आहे.

सरकारने आयएएस, आयपीएससाठी सध्या प्रणाली ऐवजी मॅनेजमेंट स्कूलचा वापर करायला हवा. सध्याच्या प्रणालीत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची निवड होते. त्यानंतर त्यांना मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. परंतु मॅनेजमेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांना विशेषज्ञ बनवता येईल. त्यानंतर पुढील 30-40 वर्ष तो संबंधित क्षेत्रात देशाची सेवा करु शकेल.

यूपीएससीमधील सध्याचा पॅटर्न हा 1858 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची अपील करत त्यांनी म्हटले, मला आशा आहे की भारत केवळ प्रशासन प्रमुख व्यवस्थेमध्ये न राहता व्यवस्थापनाभिमुख व्यवस्थेत असेल. मंत्रिमंडळाच्या पातळीवरील समित्यांचे अध्यक्ष म्हणून आणि प्रत्येक प्रमुख निर्णयासाठी मंत्र्यांची आणि नोकरशहांची नियुक्ती करण्याची सूचना नारायणमूर्ती यानी केली.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?