AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकहीजण वाचला नाही, सर्वच्या सर्व 22 मजूर ठार, काहींच्या डेडबॉड्या सापडणंही मुश्किल… अख्खा ट्रकच डोंगरावरून कोसळला…

रस्ते अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोडवरील वाहतूकीचे नियम न पाळल्याने अपघातात दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात दरीत कोसळलेल्या ट्रकमधील सर्वच्या सर्व मजूर ठार झाले आहेत.

एकहीजण वाचला नाही, सर्वच्या सर्व 22 मजूर ठार, काहींच्या डेडबॉड्या सापडणंही मुश्किल... अख्खा ट्रकच डोंगरावरून कोसळला...
प्रातिनिधीक छायाचित्र
| Updated on: Dec 11, 2025 | 7:07 PM
Share

अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात गुरुवारी एक भयानक रस्ते अपघात घडला आहे. चकलागम येथे मजूरांनी भरलेला एक ट्रक पर्वतावरुन थेट दरीत कोसळला आहे. या ट्रकमध्ये एकूण २२ मजूर होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार यातील १९ मजूर हे आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकरी टी एस्टेटचे रहाणारे होते. सध्या घटनास्थळी बचाव पथकांद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले आहे. आतापर्यंत १३ मजूरांचे मृतदेह सापडले आहेत. अन्य मजूरांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे.

ट्रकमध्ये २२ मजूर होते

असे माहिती सांगितली जात आहे की सर्व मजूर रस्त्याच्या निर्मितीसाठी या ट्रकमधून जात होते. तेव्हा हॅलोंग-चकलागम रस्त्यावर मेटेलियांगच्या जवळ ट्रक अनियंत्रित होऊ डोंगरावरुन कोसळला. या अपघाताच्यावेळी २२ मजूर ट्रकमध्ये सवार होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना जेव्हा ट्रक खाली कोसळताना पाहिला त्यानंतर पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडची टीम घटना स्थळी पोहचली आणि त्यांनी मदतकार्ये सुरु केले.

आसामच्या १९ मजूरांचा मृत्यू

पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या टीमने आतापर्यंत १३ मृतदेहांना ताब्यात घेतले आहे. ९ जणांचा शोध अजूनही सुरु आहे. १९ मजूरांची ओळख पटली आहे. ज्याची नावे बुद्धेश्वर दीप, राहुल कुमार, समीर दीप, जोन कुमार, पंकज मानकी, अजय मानकी, विजय कुमार, अभय भूमिज, रोहित मानकी, बीरेंद्र कुमार, अगर ताती, धीरेन चेतिया, रजनी नाग, दीप गौला, रामचबक सोनार, सोनातन नाग, संजय कुमार, करण कुमार आणि जोनास मुंडा अशी आहेत. हे सर्व १९ मजूर आसामच्या गेलापुखुरी चहाचा मळा, तिनसुकिया येथे राहाणारे आहेत.

असे म्हटले जात आहे की  ट्रक ज्या भागातील दरीत कोसळला, तो शहरापासून दूर दुर्गम भाग आहे. खूप वेळानंतर पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार पोलीसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी १८ तास लागले. त्यानंतर बचाव मोहिम सुरु झाली. पोलिसांना आतापर्यंत १३ डेड बॉडी मिळाली आहे. ९ अन्य बेपत्ता आहेत. यापैकी कोणीही वाचण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.