AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळातून चीन, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर, 52 सैन्य उपग्रहांचे होणार लॉन्चिंग

उपग्रहांचा वापर प्रामुख्याने लष्करी, गुप्तचर, पर्यावरणीय आणि व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येतो. उपग्रहांमध्ये उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे, रडार, इन्फ्रारेड सेन्सर आणि इतर उपकरणे असतात. त्यामुळे रिअल-टाइममध्ये किंवा नियमित अंतराने प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर डेटा मिळतो.

अंतराळातून चीन, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर, 52 सैन्य उपग्रहांचे होणार लॉन्चिंग
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 30, 2025 | 2:51 PM
Share

ऑपरेशन सिंदूर दरम्यान उपग्रह तंत्रज्ञानाचा झालेला फायदा सर्वांना माहीत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, सिग्नल जॅमिंग आणि रडार तंत्रज्ञानाची काय भूमिका राहिली? ते सर्व जगाने पाहिले. त्यावेळी भारताने 22 मिनिटे पाकिस्तानच्या संरक्षण संस्थांची सिग्नल प्रणाली जाम केली होती. या 22 मिनिटांत भारताने पाकिस्तानवर हल्ला करुन दहशतवादी तळ नष्ट केली. इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरचे हे युद्ध अंतराळात फिरणाऱ्या भारतीय उपग्रहांमुळे शक्य झाले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान फायदा

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीर, जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांच्या ठिकाणांची अचूक माहिती भारताला मिळाली. त्या इंटेलिजेन्स इनपूटच्या मदतीने भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुजफ्फराबाद, कोटली आणि सियालकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारत उपग्रहाचे हे तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्थसंकल्पात भरीव तरतूद

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने शत्रू क्षेत्रांवरील देखरेख वाढवण्यासाठी ५२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे भारताला दक्षिण आशियासह संपूर्ण जगातील प्रतिमा उपग्रहच्या माध्यमातून मिळू शकतील. गरज पडल्यास या उपग्रहांचा वापर भारत लष्करी उद्देशांसाठी करणार आहे. भारताने अंतराळातून देखरेख ठेवण्यासाठी मागील वर्षी २६ हजार ९६८ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. या उपग्रहांचे नेटवर्क या प्रकल्पाचा भाग आहे. या योजनेत इस्त्रोचे २१ उपग्रह आणि तीन खासगी कंपन्यांचे ३१ उपग्रहांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाचे लक्ष

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला उपग्रह २०२६ मध्ये प्रेक्षपित करण्यात येणार आहे. या योजनेतील शेवटच्या उपग्रहाचे लॉचिंग २०२९ मध्ये होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या योजनेवर लक्ष ठेवले जात आहे. या उपग्रहांच्या नेटवर्कमुळे चीन, पाकिस्तान आणि हिंद महासागरातील देखरेख अधिक प्रभावी होणार आहे. शत्रूंच्या प्रत्येक हालचालींची माहिती या उपग्रहांच्या माध्यमातून मिळणार आहे.

उपग्रहांचा वापर प्रामुख्याने लष्करी, गुप्तचर, पर्यावरणीय आणि व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येतो. उपग्रहांमध्ये उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे, रडार, इन्फ्रारेड सेन्सर आणि इतर उपकरणे असतात. त्यामुळे रिअल-टाइममध्ये किंवा नियमित अंतराने प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर डेटा मिळतो.

Follow Us
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर