AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं चीनला मोठं गिफ्ट, चायनाकडून जोरदार कौतुक

भारतानं नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे चीनने भारताचं कौतुक केलं असून, भारताचा हा निर्णय दोन्ही देशांसाठी खूप फायद्याचा असल्याचं चीनने म्हटलं आहे. यामुळे व्यापाराला आणखी गती येणार आहे.

भारताचं चीनला मोठं गिफ्ट, चायनाकडून जोरदार कौतुक
चीनकडून भारताचं कौतुक Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2025 | 9:32 PM
Share

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत, तर दुसरीकडे भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. त्यातच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे भारतानं आता चीनी व्यावसायिकांसाठी व्यावसाय व्हिसाची प्रक्रिया जलद केली आहे. भारताच्या या निर्णयाचं चीनकडून कौतुक करण्यात आलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतानं उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असून, दोन्ही देशांच्या फायद्याचं असल्याची प्रतिक्रिया यावर चीनने दिली आहे. तर दुसरीकडे भारतानं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तो म्हणजे गेल्याच महिन्यात भारतानं थेट भारत ते चीन विमान सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे, कोरोना काळापासून भारत चीन थेट विमान सेवा बंद करण्यात आली होती.

भारताचं कौतुक

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जियाकुन यांना नुकताच भारतानं चीनी व्यावसायिकांच्या व्यावसाय व्हिसाची प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, याला उत्तर देताना ते म्हणाले की, भारतानं अतिशय सकारात्मक पाऊल उचललं आहे, भारतानं उचललेले हे पाऊल दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, भारताच्या या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो. भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणखी सुलभ होईल, तसेच देवाण -घेवाण देखील वाढेल, द्विपक्षीय व्यापाराला गती येईल.

भारत -चीन थेट विमान सेवा

दरम्यान भारतानं गेल्याच महिन्यामध्ये भारत ते चीन थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना काळात भारतानं ही विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा भारत ते चीन थेट विमान सेवा सुरू झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील दळणवळण अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफवर प्रतिक्रिया देताना आम्ही भारताच्या वस्तूंचं आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं चीनने म्हटलं होतं.

Follow Us
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष