AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ राज्यात संघाच्या नेत्यांना पीएफआयपासून धोका; केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

28 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या आठ संघटनांवर पाच वर्षाची बंदी घातली आहे.

'या' राज्यात संघाच्या नेत्यांना पीएफआयपासून धोका; केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल
'या' राज्यात संघाच्या नेत्यांना पीएफआयपासून धोका; केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2022 | 10:20 AM
Share

नवी दिल्ली: पीएफआयकडून (PFI) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनआयएच्या एका अहवालातून हे स्पष्ट झालं आहे. पीएफआयकडून संघाच्या केरळमधील नेत्यांना धोका असल्याची माहिती मिळताच एनआयएने याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली. त्यानंतर केंद्र सरकारने (central government) संघाच्या केरळमधील या पाचही नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

केंद्र सरकारने एनआयए आणि आयबीच्या रिपोर्टरच्या आधारे केरळमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या पाच नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे या पाचही नेत्यांच्या संरक्षणासाठी आता पॅरामिलिट्री फोर्सचे कमांडो तैनात असतील.

संघाचे नेते पीएफआयच्या रडारवर असल्याचा रिपोर्ट केंद्रीय तपास यंत्रनेने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. 22 सप्टेंबर रोजी पीएफआयचा सदस्य मोहम्मद बशीरच्या घरी एनआयएने छापेमारी केली होती. यावेळी एनआयएला एक यादी सापडली होती. त्यात संघाच्या पाच नेत्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळेच या पाचही नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

सुरक्षेच्या येलो बुकच्या नुसार, गृहमंत्रालयाच्या वाय कॅटेगिरीच्या सुरक्षेत एकूण 8 सुरक्षा जवान तैनात असतात. त्यात ज्या व्हिआयपीला सुरक्षा दिली जाते, त्यात 5 आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या घरी तैनात करण्यात येतात. त्याचबरोबर तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओची सुरक्षाही दिली जाते.

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या आठ संघटनांवर पाच वर्षाची बंदी घातली आहे. एनआयएसहीत विविध तपास यंत्रणांनी केलेल्या छापेमारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

22 आणि 27 सप्टेंबर रोजी एनआयए, ईडी, राज्य पोलीस आणि एटीएसने देशभरातील पीएफआयच्या ठिकाण्यांवर छापेमारी केली होती. यावेळी 350 जणांची धरपकड करण्यात आली. यावेळी तपास यंत्रणाच्या हाती कारही पुरावे लागले आहेत. त्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.