AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लॉरेन्स बिश्नोईला मला मारायचं असेल तर त्याने लवकर मारुन टाकावं’, खासदार पप्पू यादव यांचं वक्तव्य

"लॉरेन्स बिश्नोईचा फोन आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, त्याला कुणाला मारायचं आहे ते त्याचं काम आहे. लॉरेन्सला सलमान खानला मारायची इच्छा आहे तर मारुन टाक. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. सलमानला वाचवायचं किंवा न वाचवायचं याबाबत सरकारची जबाबदारी आहे", असं पप्पू यादव म्हणाले.

'लॉरेन्स बिश्नोईला मला मारायचं असेल तर त्याने लवकर मारुन टाकावं', खासदार पप्पू यादव यांचं वक्तव्य
'लॉरेन्स बिश्नोईला मला मारायचं असेल तर त्याने लवकर मारुन टाकावं', खासदार पप्पू यादव यांचं वक्तव्य
| Updated on: Nov 01, 2024 | 6:52 PM
Share

बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईला दोन टक्क्याचा किरकोळ गुन्हेगार म्हटलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांना वेगवेगळ्या फोन नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी येत आहे. या धमकीवर अखेर पप्पू यादव यांनी मौन सोडलं आहे. “माझं कुणासोबत शत्रूत्व नाही. तसेच मला कुणाची भीती देखील वाटत नाही. लॉरेन्सला मला मारायचं असेल तर त्याने मला मारुन टाकावं. मी तुम्हाला रोखत नाहीय. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत की, मी घाबरलो आहे. भाई मला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या माध्यमातून मारुन टाका”, असं पप्पू यादव म्हणाले.

“माझी इच्छा आहे की, मी लवकर मरावं, जेणेकरुन हिंदुस्तानातून सत्य गायब होऊन जाणार. मी सर्व काही सोडू शकतो. पण घाबरुन आयुष्य जगायची मला सवय नाही. मी आपल्या विचारधारेशी तडजोड करु शकत नाही”, असं पप्पू यादव म्हणाले. “लॉरेन्स बिश्नोईचा फोन आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, त्याला कुणाला मारायचं आहे ते त्याचं काम आहे. लॉरेन्सला सलमान खानला मारायची इच्छा आहे तर मारुन टाक. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. सलमानला वाचवायचं किंवा न वाचवायचं याबाबत सरकारची जबाबदारी आहे”, असं पप्पू यादव म्हणाले. तसेच “लोकांनी माझ्या सुरक्षेची चिंता करु नये. मला दोन दिवसांपूर्वीच धमकी देण्यात आली, तेव्हा मी झारखंडहून नुकतंच पूर्णिया आलो होतो”, अशी प्रतिक्रिया पप्पू यादव यांनी दिली.

पप्पू यादव यांनी बिश्नोई गँगला आधी काय म्हटलं होतं?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी बिश्नोई गँगवर निशाणा साधला होता. त्यांनी लॉरेन्स बिश्नोईला किरकोळ गुन्हेगार म्हटलं होतं. “मला जर पोलिसांनी सहमती दिली तर मी 24 तासात संपूर्ण गँगला संपवून टाकणार. एक गुन्हेगार जेलमध्ये बसून आव्हान देत लोकांना मारत आहे आणि सर्व मुक्याने पाहत आहेत”, अशा तिखट शब्दांत पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईवर टीका केली होती. त्यानंतर बिश्नोई गँगकडून पप्पू यादव यांना वारंवार धमकी दिली जात आहे.

पप्पू यादव यांना बिश्नोई गँगच्या शूटरची धमकी

बिश्नोई गँगच्या एका शूटरने पप्पू यादव यांना फोन करुन धमकी दिली. “कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना विचार करुन बोलावं. तुमचं बिश्नोई भाऊ सोबत काय शत्रूत्व आहे?”, असं शूटर पप्पू यादव यांना म्हणाला होता. “आम्हाला कर्म आणि कांड दोन्ही माहिती आहेत”, असं शूटर म्हणाला. यावेळी पप्पू यादव त्याला आपण 7 वेळा खासदार म्हणून निवडून आल्याचं सांगतात. त्यावर तो शूटर आम्हाला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. आमच्या रस्त्यात जो येईल त्याला परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पप्पू यादव यांना देण्यात आली होती.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.