AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणुक आयुक्तांची घोषणा

लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून निवडणुक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण देशात घरोघरी जाऊन मतदार होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी | लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदा 'या' लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणुक आयुक्तांची घोषणा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 16, 2024 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदान करणार असल्याची माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये देशात पहिल्यांदाच घरोघरी मतदानाची सोय केल्याची घोषणा केली आहे.

या लोकांचं घरोघरी जाऊन होणार मतदान

मतदारांमध्ये यंदा 82 लाख मतदार हे 85 वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ज्यांना पोलिंग बुथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे. जास्तीत जास्त आणि प्रत्येकाने मतदान करावं यासाठी आम्ही ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या  घराजवळ असणाऱ्या पोलिंग बुधवर मतदान करावं, असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. यासाठी एक फॉर्म देण्यात येणार आहे तो भरावा लागणार आहे.

आमच्या टीममधील प्रत्येकाला ट्रेनिंद देण्यात आलं आहे. जंगल, बर्फ, नदी ते घोड्याने, हत्तीवर किंला हेलिकॉप्टरने ते सर्वत्र जाणार आहेत. कारण प्रत्येकाला मतदान करता यावं, यासाठी आम्ही पूर्म तयारी केल्याचं राजीव कुमार म्हणाले.

ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी असणार आहे. देशातील निवडणूक म्हणजे 1 सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राजकिय पक्ष यांच्याशी संवाद साधला आहे, ही निवडणूक निःपक्ष पणे होईल, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात पार पडल्या होत्या. तर 23 मे रोजी निकाल लागला होता. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा 5 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा