AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनाची नाही तर मनाची..मदतीचा आव आणून हा त्रास कशाला…

मध्य प्रदेशातील एका प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. गणवेश मळलेला होता म्हणून गणवेश काढून शिक्षकाने धुतला आणि विद्यार्थिनीला अर्धनग्न अवस्थेत थांबायला लावले.

जनाची नाही तर मनाची..मदतीचा आव आणून  हा त्रास कशाला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 25, 2022 | 4:09 PM
Share

भोपाळः मध्य प्रदेशात एका शिक्षकाने शाळेतील 10 वर्षीय आदिवासी मुलीला इतर विद्यार्थिनींसमोर (Student) तिचा मळलेला गणवेश काढण्यास सांगितल्याचा प्रकार घडल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने या घटनेबद्दल माहिती दिली असून शिक्षकाचा कपडे धुतानाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. मुलीला अर्धनग्न अवस्थेत सर्वांसमोर थांबवल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहडोल जिल्ह्यातील जयसिंगनगर विभागातील पौरी येथील बारा टोला, सरकारी प्राथमिक शाळेत (Primary school) हा प्रकार घडला असून या घटनेची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

मध्य प्रदेशातील ज्या सरकारी शाळेतील हा फोटो व्हायरल जाा आहे. त्यामध्ये मुलगी अर्धनग्न अवस्थेत आहे तर शिक्षक श्रवण कुमार त्रिपाठी मुलीचा गणवेश धुताना दिसत आहे.

तर या व्हिडीओमध्ये त्या मुलीबरोबर इतर काही विद्यार्थिनीही तिच्याजवळ थांबल्या असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या शाळेतील त्या त्रिपाठी नावाच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा गणवेश धुतल्यानंतर तो सुकत बाहेर घातला होता. त्यावेळी त्या शिक्षकाने सांगितले की, गणवेश सुकत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनीला त्याच अवस्थेत शाळेच्या आवारात अर्धनग्न अवस्थेतच थांबावे लागणार असल्याचे शिक्षकाने म्हटले असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे.

त्यानंतर गणवेश सुकल्यानंतर मुलीला गणवेश परिधान तिला वर्गात पाठवण्यात आले. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक श्रावण त्रिपाठी यांनी स्वत:ला स्वच्छता मित्र म्हणवून घेत त्या आदिवासी विद्यार्थिनीसोबतचा फोटो काढून शिक्षण विभागाच्या सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई करत या शिक्षकाला निलंबित केले आहे.

शाळेतील विद्यार्थिनीसोबत असा प्रकार घडल्याचे गावातील नागरिकांच्या लक्षात येताच त्या शाळेतील मुख्याध्यापकांसमोर घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे प्रकरण आदिवासी विभागाच्या आयुक्तांना समजल्यानंतर शिक्षक श्रावण त्रिपाठी या शिक्षकाला निलंबित केले गेले आहे.

Follow Us
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?