AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather update : मोठं संकट आलं, देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय होणार?

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता देशात काही भागात पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाचा हा अंदाज लक्षात घेता महाराष्ट्रात काय स्थिती असेल, असे विचारले जात आहे.

IMD Weather update : मोठं संकट आलं, देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय होणार?
RAIN UPDATEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 19, 2026 | 9:04 PM
Share

Weather Update : सध्या हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. थंडी थोडी कमी झालेली असून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. असे असतानाच आता हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचा परिणाम म्हणून आता देशतील काही भागांत पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात हा पाऊस बरसणार का, असेही विचारले जात आहे.

21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी पाऊस

हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमान आणि नकोबार बेटासमूहात 21 फेब्रुवारी रोजी तर 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आगामी सात दिवसांत उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार

हिंद महासागर तसेच दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच्या परिणामस्वरुप आगामी 24 तासांत हा कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेच्या दिशेने सरकेल. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी आणखी एक नवा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तराखंड, अंदमान-निकोबारमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 23 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय?

दुसरीकडे पुढच्या सात दिवसांत उत्तर आणि पश्चिम भारतात तपामानात वाढ होईल. पूर्व भारतात तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढू शकते. महाराष्ट्रातही तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. दरम्यान, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय? असा प्रश्न विचारला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्यातरी पावसाचे संकट नाही. यासह आगामी काही दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होऊ शकते.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा