AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Sampada Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM मोदींनी केली मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Kisan Sampada Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM मोदींनी केली मोठी घोषणा
pm modi and farmer
| Edited By: | Updated on: Aug 07, 2025 | 5:07 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी एक निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे. तसेच उर्वरित निर्णय हे ईशान्य भारतातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्याबाबत आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे बजेट वाढवून 6520 कोटी रुपये करण्यात आले आहे. यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) साठी 2000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्था मजबूत होण्यास फायदा होणार आहे.

किसान संपदा योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान संपदा योजना शेतकऱ्यांसाठी असणारी भारत सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेचा हेतू देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे हे आहे. याद्वारे कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जातो. आता यासाठी 6520 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

1920 कोटी रुपयांचा निधी कशासाठी वापरला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी 1920 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण 6520 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. 1920 कोटी रुपयांची रक्कम बहु-उत्पादन अन्न विकिरण युनिट्स आणि घटक योजनेअंतर्गत 100 NABL अन्न चाचणी प्रयोगशाळा बांधण्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच PMKSY च्या विविध घटक योजनांअंतर्गत प्रकल्पांसाठी 920 कोटी रुपये वापरले जाणार आहेत.

4 रेल्वे मार्गांसाठी 11168 कोटींचा निधी मंजूर

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 4 रेल्वे मार्गांसाठी 11168 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इटारसी ते नागपूर या चौथ्या रेल्वे मार्गासाठी 5451 कोटी रुपये, अलुआबारी रोड ते न्यू जलपाईगुडी रेल्वे मार्गासाठी 1786 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2189 कोटी रुपये आणि डांगोआपोसी-करौली रेल्वे मार्गासाठी 1750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.