AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामागे… पाकिस्तानचा कांगावा, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ती संतापजनक प्रतिक्रिया, भारताला सहकार्य करणार?

Pakistan Reaction on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची एक संघटना द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे. तर त्यावर पाकिस्तान सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे.

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामागे... पाकिस्तानचा कांगावा, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ती संतापजनक प्रतिक्रिया, भारताला सहकार्य करणार?
पहलगाम दहशतवादी हल्लाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 23, 2025 | 12:15 PM
Share

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा एक गट द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे. तर या हल्ल्याचा कट हा पाकिस्तानचे मोठे शहर रावळपिंडीत शिजल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालीद हा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तान सरकारचा कांगावा यानिमित्त पुन्हा उघड झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड

रावळपिंडीत या हल्ल्याचा कट रचला. यामध्ये सहा दहशतवादी होते. त्यात दोन काश्मीरचे होत तर चार दहशतवादी हे पाकिस्तानी होते. त्यातील दोन जण हे पाकिस्तानच्या लष्करातील कमांडो असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दहशतवादांनी हल्ल्यावेळी बॉडीकॅम कॅमेरा लावल्याचे उघड झाले आहे.

ती संतापजनक प्रतिक्रिया

दरम्यान पाकिस्तानचे ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. आपला देश सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया आसिफ यांनी दिली आहे. त्यांनी पाकिस्तानी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उलट आसिफ यांनी भारतावरच आरोप लावला आहे. या हल्ल्यामागे भारतातीलच लोक असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला. भारतात नागालँडपासून ते मणिपूरपर्यंत आणि काश्मीरमधील लोक तिथल्या सरकारविरोधात असल्याचे संतापजनक वक्तव्य आसिफ यांनी केले.

इतकेच नाही तर केंद्र सरकार तिथल्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत. त्यांचे शोषण करत आहे. त्यामुळेच लोक त्यांच्याविरोधात असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्याशी पाकिस्तानचे काही पण देणे घेणे नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. नागरिकांवर असा हल्ला व्हायला नको असे आसिफ म्हणाले. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर अजून भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. थोड्याच वेळात ११ वाजता दिल्लीत सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक होत आहे. त्यात रणनीती ठरणार असल्याचे समजते.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.