AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामागे… पाकिस्तानचा कांगावा, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ती संतापजनक प्रतिक्रिया, भारताला सहकार्य करणार?

Pakistan Reaction on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची एक संघटना द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे. तर त्यावर पाकिस्तान सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे.

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामागे... पाकिस्तानचा कांगावा, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ती संतापजनक प्रतिक्रिया, भारताला सहकार्य करणार?
पहलगाम दहशतवादी हल्लाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 23, 2025 | 12:15 PM
Share

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा एक गट द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे. तर या हल्ल्याचा कट हा पाकिस्तानचे मोठे शहर रावळपिंडीत शिजल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालीद हा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तान सरकारचा कांगावा यानिमित्त पुन्हा उघड झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड

रावळपिंडीत या हल्ल्याचा कट रचला. यामध्ये सहा दहशतवादी होते. त्यात दोन काश्मीरचे होत तर चार दहशतवादी हे पाकिस्तानी होते. त्यातील दोन जण हे पाकिस्तानच्या लष्करातील कमांडो असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दहशतवादांनी हल्ल्यावेळी बॉडीकॅम कॅमेरा लावल्याचे उघड झाले आहे.

ती संतापजनक प्रतिक्रिया

दरम्यान पाकिस्तानचे ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. आपला देश सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया आसिफ यांनी दिली आहे. त्यांनी पाकिस्तानी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उलट आसिफ यांनी भारतावरच आरोप लावला आहे. या हल्ल्यामागे भारतातीलच लोक असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला. भारतात नागालँडपासून ते मणिपूरपर्यंत आणि काश्मीरमधील लोक तिथल्या सरकारविरोधात असल्याचे संतापजनक वक्तव्य आसिफ यांनी केले.

इतकेच नाही तर केंद्र सरकार तिथल्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत. त्यांचे शोषण करत आहे. त्यामुळेच लोक त्यांच्याविरोधात असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्याशी पाकिस्तानचे काही पण देणे घेणे नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. नागरिकांवर असा हल्ला व्हायला नको असे आसिफ म्हणाले. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर अजून भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. थोड्याच वेळात ११ वाजता दिल्लीत सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक होत आहे. त्यात रणनीती ठरणार असल्याचे समजते.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....