AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड, भारतानं एअर स्ट्राईक करताच आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर

आम्ही दहशतवाद्यांना थारा देत नाहीत, दहशतवाद्यांचा आणि आमचा संबंध नाही असा दावा वारंवार पाकिस्तानकडून करण्यात येतो, मात्र आता याचा मोठा पुरावा समोर आला आहे.

पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड, भारतानं एअर स्ट्राईक करताच आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 4:37 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वातावरण होतं. अखेर भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पीओके आणि पाकिस्तामध्ये असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील चार तर पीओकेमधील 5 असे एकूण 9 दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत.  या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अब्दुल रौफ हा देखील मारला गेला आहे.

एकीकडे पाकिस्तानकडून असा दावा करण्यात येत आहे की, आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड झाली आहे.  भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अब्दुल रौफ हा मारला गेला. अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते, यावरून पाक लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत पुन्हा एकदा उघड झाली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानमधील 4 तर पाकव्याप्त काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा समावेश आहे.  भारतानं एअर स्ट्राईक करून एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.

पाकच्या उलट्या बोंबा

मात्र दुसरीकडे पाकिस्तान आता उलट्या बोंबा मारत असल्याचं दिसून येत आहे. भारतानं ज्या-ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानने केला आहे. एवढंच नाही तर भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये एकही सामान्य मानसाची जीवितहानी झालेली नाही, मात्र असं असताना देखील आमच्या 26 लोकांचा मृत्यू झाला असून, 46 जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतानं 9 नाही तर सहा ठिकाणी एअर स्ट्राईक केला असा दावाही पाकिस्तानने केला आहे. आम्ही भारताचे पाच लाढाऊ विमानं पाडल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.  मात्र दुसरीकडे दहशतवाद्याच्या दफनविधीसाठी पाकिस्तान लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिल्यानं पाकिस्तान आणि दहशतवादाचा संबंध पुन्हा एकदा उघडल झाला आहे.

Follow Us
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा