AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड, भारतानं एअर स्ट्राईक करताच आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर

आम्ही दहशतवाद्यांना थारा देत नाहीत, दहशतवाद्यांचा आणि आमचा संबंध नाही असा दावा वारंवार पाकिस्तानकडून करण्यात येतो, मात्र आता याचा मोठा पुरावा समोर आला आहे.

पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड, भारतानं एअर स्ट्राईक करताच आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 4:37 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वातावरण होतं. अखेर भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पीओके आणि पाकिस्तामध्ये असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील चार तर पीओकेमधील 5 असे एकूण 9 दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत.  या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अब्दुल रौफ हा देखील मारला गेला आहे.

एकीकडे पाकिस्तानकडून असा दावा करण्यात येत आहे की, आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड झाली आहे.  भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अब्दुल रौफ हा मारला गेला. अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते, यावरून पाक लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत पुन्हा एकदा उघड झाली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानमधील 4 तर पाकव्याप्त काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा समावेश आहे.  भारतानं एअर स्ट्राईक करून एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.

पाकच्या उलट्या बोंबा

मात्र दुसरीकडे पाकिस्तान आता उलट्या बोंबा मारत असल्याचं दिसून येत आहे. भारतानं ज्या-ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानने केला आहे. एवढंच नाही तर भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये एकही सामान्य मानसाची जीवितहानी झालेली नाही, मात्र असं असताना देखील आमच्या 26 लोकांचा मृत्यू झाला असून, 46 जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतानं 9 नाही तर सहा ठिकाणी एअर स्ट्राईक केला असा दावाही पाकिस्तानने केला आहे. आम्ही भारताचे पाच लाढाऊ विमानं पाडल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.  मात्र दुसरीकडे दहशतवाद्याच्या दफनविधीसाठी पाकिस्तान लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिल्यानं पाकिस्तान आणि दहशतवादाचा संबंध पुन्हा एकदा उघडल झाला आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?