AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालमध्ये केंद्राने मोठी गुंतवणूक केली पण…नरेंद्र मोदींचा तृणमूल सरकावर हल्लाबोल; केले गंभीर आरोप!

आपल्या भाषणात मोदी यांनी पश्चिम बंगाल या राज्याच्या विकासावरही भाष्य केले. त्यांनी बंगालमधील विद्यमान तृणमूल काँग्रेसच्या सरकारवरही टीका केली. तृणमूलच्या सरकारने पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या अनेक योजना चालू दिलेल्या नाहीत. त्यामुळे या राज्याचा विकास रखडलेला आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.    

पश्चिम बंगालमध्ये केंद्राने मोठी गुंतवणूक केली पण...नरेंद्र मोदींचा तृणमूल सरकावर हल्लाबोल; केले गंभीर आरोप!
narendra modi in wittImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2026 | 9:27 PM
Share

Narendra Modi In WITT : टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे (WITT) समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका मांडली. सध्याच्या जागतिक पातळीवरील घडामोडीत भारताची भूमिका काय आहे? जागतिक घडामोडीमध्ये भारत नेमका कुठे आहे? भारतात नेमका काय विकास झाला? यावर मोदी यांनी सविस्तर भाष्य केले. आपल्या भाषणात मोदी यांनी पश्चिम बंगाल या राज्याच्या विकासावरही भाष्य केले. त्यांनी बंगालमधील विद्यमान तृणमूल काँग्रेसच्या सरकारवरही टीका केली. तृणमूलच्या सरकारने पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या अनेक योजना चालू दिलेल्या नाहीत. त्यामुळे या राज्याचा विकास रखडलेला आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.

जगालाही हा नवा भारत दिसतोय

पूर्वीही योजना व्हायच्या. पण आज परिणाम दिसत आहे. पूर्वी गती धीम होती. पण आज भारत फास्ट ट्रॅकवर आहे. आज संकल्प सिद्धीला जात आहे. त्यामुळे जगालाही हा नवा भारत दिसत आहे. आपल्या विकासासाठी भारत काहीच कसूर सोडत नसल्याचं दिसत आहे. भूतकाळात विकासाचं असंतुलन झालं होतं, आज त्याचं संधीत रुपांतर करायचं आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

बिहारमध्ये सहा सात दशकात…

पूर्व भारत संसाधनाने भरपूर भरलेला आहे. अनेक दशकांपासून पूर्व भारतात राज्य केलं. त्यांनी काहीच केलं नाही. आज या पूर्व भारतात विकास होत आहे. ओडिसात सेमी कंडक्टरपासून अनेक नव्या सेक्टरचा विकास होत आहे. बिहारमध्ये सहा सात दशकात गंगा नदीवर एकच पूल बनला होता. या बिहारमध्ये गेल्या दशकात पाच ते सहा पूल बनले आहे. उत्तर प्रदेशात कट्टा मॅन्यूफॅक्चरिंगची फॅक्ट्री होता. आता तिथे मोबाईल बनत आहे, असेही मोदी देशातील विकासावर बोलताना म्हणाले.

पश्चि बंगालवर बोलताना मोदी काय म्हणाले?

पश्चिम बंगाल हा भारताचा कल्चर, उद्योगाचं हब होतं. केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पण तिथल्या निर्मम सरकारने विकासाला ब्रेक लावला आहे. आयुष्यमान योजना, पीएम आवाज योजना, चाय बागान श्रमिकांसाठीच्या योजनेला ब्रेक लावला आहे. विकास आणि जनकल्याणापेक्षा राजकीय स्वार्थाला निर्मम सरकार प्राधान्य दिलं आहे. काँग्रेसने या प्रकारच्या राजकारणाला सुरुवात केली, अशी टीका मोदी यांनी केली.

मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

तसेच, कोणत्याही प्रकारच्या विकासाला काँग्रेसचा विरोध राहिला आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हेच केलं. त्यांनी गुजरातच्या इमेजवर सवाल केला, गुजरातच्या प्रगतीवर टीका केला. हे करत असताना काँग्रेसचा विरोध रिजनल झाला. टीका जेव्हा देशाच्या विकासावर सवाल करत असेल तर हा केवळ सरकारचा विरोध राहत नाही. तर देशाच्या प्रगतीचा विरोध होतो. काँग्रेस आज याच मानसिकतेची गुलाम झाला आहे. प्रत्येक चांगल्या कामात कसूर शोधली जात आहे. कोरोनाच्या लसपासून मेक इन इंडियापर्यंत काँग्रेस टीका करत आली, असाही हल्लाबोल मोदी यांनी केला.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत