AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stampede in Bangalore : बंगळुरुतील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, नक्की काय म्हटलं?

PM Narendra Modi Stampede in Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाला गाळबोट लागलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पीएमओकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Stampede in Bangalore : बंगळुरुतील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, नक्की काय म्हटलं?
Narendra Modi On Stampede In BangaloreImage Credit source: @narendramodi
| Updated on: Jun 04, 2025 | 9:02 PM
Share

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर घरच्या स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर एकच गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. चाहत्यांनी स्टेडियमध्ये जाण्यासाठी गेटवर गर्दी केली होती. चाहत्यांना विनंती करुनही ते ऐकत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बंगळुरुतील या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय? जाणू घेऊयात.

“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकर बरं व्हावं अशी मी प्रार्थना करतो”, असं पीएमओ एक्स अकाउंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.

दुर्घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह

एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या दुर्घटनेनंतर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर अवघ्या 18 तासांतच सत्कार समारंभाचं आयोजन करण्याची घाई करण्यात का आली? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट

दुर्घटनेनंतर जोरदार राजकारण, राजीनाम्याची मागणी

दरम्यान बंगळुरुतील या दुर्घटनेनंतर आता राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या सर्व घटनेबाबत जाहीरपणे माफी मागितली. “चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे मी पोलिसांना दोष देणार नाही. यात पोलिसांचा दोष नाही. या सर्व दुर्घटनेबद्दल मी माफी मागतो”, असं डी के शिवकुमार म्हणाले. तर सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.