AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSI Recruitment Scam: ‘न्याय न मिळाल्यास अतिरेकी संघटनेत जाऊ’, मोदींना पोलीस भरती विद्यार्थ्यांचं रक्तानं माखलेलं पत्र

PSI Recruitment Scam : सरकारच्या निर्णयामुळे 54,289 विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

PSI Recruitment Scam: 'न्याय न मिळाल्यास अतिरेकी संघटनेत जाऊ', मोदींना पोलीस भरती विद्यार्थ्यांचं रक्तानं माखलेलं पत्र
भरती घोटाळ्याचे गंभीर पडसादImage Credit source: TV9 Marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 16, 2022 | 12:56 PM
Share

बंगळुरु : कर्नाटकात पीएसआय भरतीत (PSI Recruitment Scam) झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलंय. या भरती घोटाळ्याची कसून चौकशी (Investigation) करावी, यासाठी परीक्षेस बदलेल्या काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) पत्र लिहून मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या रक्ताने विद्यार्थ्यांनी (Letter with Blood) हे पत्र लिहिलंय. इतकं काय तर, न्याय मिळाला नाही, तर अतिरेकी संघटनेत सामील होण्याची धमकी देखील या पत्राद्वारे देण्यात आलंय. हे पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 545 पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी भरती प्रकिया राबवण्यात आली होती. या भरतीप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला. या भरतीप्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेवरच सवाल उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आणि याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली होती.

तपासात काय समोर आलं?

दरम्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासातही खळबळजनक माहिती समोर आली आहे. परीक्षेदरम्यान काही शिक्षकांना शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी सहकार्य करावं, अशा प्रकारे आदेश देण्यात आल्याचा दावा केला गेलाय. कलबुर्गीमधील एका खासगी शाळेतील शिक्षकांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. सीआयडी सध्या याप्रकरणी तपास करतेय.

गेल्याच आठवड्यात डीव्हायएसपी शांता कुमार यांना ताब्यात घेतण्यात आलं होतं. कथिक सबइन्स्पेक्टर पोलीस भरती घोटाळ्यात त्यांचा हात असल्याच्या संशयावरुन त्यांना ताब्यात घेतलं गेलं होतं. या घोटाळा समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारनं पीएसआय भरतीसाठी लागलेला निकाल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्यानं परीक्षा घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं. सरकारच्या या निर्णयामुळे 54,289 विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या एका गटानं मोदींनी रक्तानं पत्र लिहून देत न्याय मिळावा अशी मागणी करताना धमकावलंही आहे. न्याय मिळाला नाही, तर अतिरेकी संघटनेत सामील होऊ, अशा इशारा पत्रातून विद्यार्थ्यांनी दिलाय. त्यामुळे खळबळ उडालीय.

घोटाळा झाल्याचं कळलं कसं?

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर हा घोटाळा झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. 100 टक्के मार्क मिळालेल्या काहीचे पेपर हे चक्रावून टाकणारे होते. अवघ्या 21 प्रश्नांची उत्तर दिलेल्यांना 100 टक्के मार्क मिळाल्यानं संशय बळावला होता. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. 55 जणांना आतापर्यंत या घोटाळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. 54 हजार विद्यार्थ्यी 545 पदांसाठी परीक्षेला सामोरं गेले होते. 75 ते 80 लाख रुपयांची लाच विद्यार्थ्यांकडून पोलीस भरतीसाठी घेण्यात आलाची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट