AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग… ‘आप’ने आखला प्लॅन

Raghav Chadha : 'आप'चे नेते संजय सिंह यांनी दावा केला आहे की, राघव चढ्ढा यांच्यासह राज्यसभेतील सात बंडखोर खासदारांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. पक्षाने राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग... 'आप'ने आखला प्लॅन
ChadhaImage Credit source: Google
| Updated on: Apr 26, 2026 | 6:41 PM
Share

दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी या सर्व बंडखोर खासदारांची राज्यसभा सदस्यता रद्द होणार असल्याचा दावा केला आहे. आता आम आदमी पार्टी बंडखोर खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणार असल्याचेही समोर आले आहे. पीटीआय-भाषाच्या वृत्तानुसार संजय सिंह यांनी राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र पाठवून राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेतील त्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची विनंती केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बंडखोरांची खासदारकी जाणार

संजय सिंह यांनी दावा केला की राज्यसभेतील या 7 बंडखोर सदस्यांची सदस्यता जाणे निश्चित आहे. या खासदारांचे हे पाऊल पक्षांतरासारखे आहे आणि संबंधित कायदेशीर तरतुदींविरोधात आहे. आम्ही कपिल सिब्बल आणि लोकसभेचे माजी महासचिव तसेच इतर अनेक संविधान तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. सर्वांचे मत आहे की कायद्यानुसार हे सर्व बंडखोर खासदार अपात्र ठरवले जाऊ शकतात.

खासदारांची धाकधूक वाढली

राज्यसभा सभापतींना पाठवलेल्या पत्रात आपने संविधानातील दहाव्या अनुसूचीचा (पक्षांतर विरोधी कायदा) उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या 7 बंडखोर खासदारांची सदस्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय सिंह यांनी म्हटले की, या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करणे पूर्णपणे असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांच्या आधारावर ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेल्या खासदारांची धाकधूक वाढली आहे.

कायद्यानुसार वेगळा गट मान्य नाही

संजय सिंह यांनी दावा केला की पक्षांतर विरोधी कायद्यानुसार, राज्यसभा असो किंवा लोकसभा, कोणत्याही सभागृहात वेगळा गट मान्य नाही. जरी त्या गटात दोन-तृतीयांश सदस्य असले तरीही तो वैध मानला जात नाही. पुढे बोलताना सिंह यांनी या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती उपराष्ट्रपतींकडे केली आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपती काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!