AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाव-खेड्यांचा होतोय कायापालट, नव्या सर्व्हेतून मोठी माहिती समोर!

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, तेथील लोकांची क्रयशक्ती याबाबत एक महत्त्वाच्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात ग्रमीण भागाला आर्थिक बळकटी मिळत आहे, असे सांगण्यात आलेले आहे.

गाव-खेड्यांचा होतोय कायापालट, नव्या सर्व्हेतून मोठी माहिती समोर!
सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- triloks/E+/Getty Images
| Updated on: Aug 01, 2025 | 2:02 PM
Share

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात चांगल्या सुधारणा व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गाव-खेड्याचा चेहरामोहरा बदलावा यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागांच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात खर्च करण्याची क्षमता, उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.

सर्वेक्षणातून नेमके काय

समोर आले?

NABARD तर्फे एक सर्वेक्षण जारी करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल जुलै 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील अर्थिक स्थिती तसेच अन्य बाबींविषयी अभ्यास करण्यात आला होता. या सर्वेक्षणाअंतर्गत साधारण 76.6 टक्के ग्रामीण कुटुंबाची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. ही आकडेवारी म्हणजे ग्रामीण भागात प्रगतीच्या वाटा खुल्या होत असल्याचे लक्षण असल्याचे म्हटले जात आहे.

उत्पन्न, कुटुंबाचा खर्च याविषयी केला अभ्यास

ग्रामीण भागात राबवण्यात येणाऱ्या योजना तसेच ग्रामविकास कार्यक्रमांचा प्रभाव किती पडतो, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. कुंटबातील उत्पन्न, कुटुंबाचा खर्च, कुटुंबावरील कर्ज याबाबतची माहिती यात गोळा करण्यात आली होती. या सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे, बँकिंग सेवा पोहोचत आहेत हेदेखील समोर आले आहे.

सर्वेक्षणाची आकडेवारी काय सांगते?

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार साधारण 76 टक्के ग्रामीण कुटुंबांनी गेल्या एका वर्षात आमची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे, असे मान्य केले आहे. तसेच 39.6 टक्के लोकांनी आमचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले आहे. तसेच ग्रामीण भारतातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. 20.6 टक्के कुटुंब बचतीकडेही कटाक्षाने लक्ष देत असल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागातील 52.6 टक्के कुटंब हे कर्ज काढून आपल्या गरजा पूर्ण करत आहेत, असंही या सर्वेक्षणात म्हणण्यात आलंय.

महागाईची चिंताही झाली कमी

याच रिपोर्टनुसार ग्रामीण भागात 74.7 टक्के कुटंब असे आहेत ज्यांना आगामी वर्षात आमचे उत्पन्न वाढेल अशी आशा आहे. 56.2 कुटुंबांना लवकरच आम्हाला चांगला रोजगार मिळू शकतो, अशी आशा आहे. आता ग्रामीण भागात महागाईची चिंताही कमी झाली आहे, असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.