AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : आतापर्यंत 17 हजार भारतीयांनी यूक्रेनची सीमा ओलांडली; तर पंतप्रधान मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.

Russia Ukraine War : आतापर्यंत 17 हजार भारतीयांनी यूक्रेनची सीमा ओलांडली; तर पंतप्रधान मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Mar 02, 2022 | 9:57 PM
Share

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध (Russia Ukraine War) आता अधिक भीषण बनलं आहे. रशियाने (Russia) युद्धाच्या सातव्या दिवशी अधिक आक्रमकपणे हल्ले सुरु केले आहेत. अशावेळी हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून (Ukraine) सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याचं आव्हान भारत सरकारपुढे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यानंतर सातत्याने जगभरातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. मंगळवारी मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रॉन यांच्याची चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी लवकरात लवकर युद्धविराम करण्याच्या मुद्द्यावर सहमती बनली आहे. दरम्यान, यूक्रेनमधील परिस्थिती अधिक खराब बनल्यामुळे भारताच्या यूक्रेनमधील दूतावासाने भारतीय नागरिकांना तातडीने खारकीव सोडण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जवळच्या तीन सुरक्षित स्थानावर जाण्यास सांगितलं आहे, जे 16 किलोमीटर परिसरात आहेत.

रशिया कीव आणि खारकीव मोठा हल्ला करण्याची शक्यता

रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : ऐकावं ते नवलच, इकडं उत्तर प्रदेशात गावची सरपंच तर यूक्रेनमध्ये एमबीबीएसची विद्यार्थीनी, यंत्रणाही गडबडली!

Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?

Follow Us
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.