कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. (sanjay raut)

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:31 AM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (shivsena leader sanjay raut slams devendra fadnavis)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. कोण काय बोलतंय याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी काय बोललो ते समजून घ्या आधी. या देशात एकापेक्षा जास्त नेते असू शकत नाही का? भाजपच्या काळात अटलबिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. प्रमोद महाजन होते. बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का? भाजपने राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा नीट अभ्यास करून बोलावं. अशी माझी त्यांना विनंती आहे. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

प्रादेशिक पक्षांनीही राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं

या देशात राज्याचा मुख्यमंत्री जो कोणी असतो तो राष्ट्रीय नेताच असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जात होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्व देशातील विरोधी पक्षनेते फार अपेक्षेने पाहतात. ममता बॅनर्जींकडेही पाहतात. शरद पवार तर या सर्वांच्या वर आहेत, असं त्यांनी सांगितलं. कधी तरी भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. आज पाच पंचवीस झाले. आज आमचे 18 खासदार आहेत. अनेकदा प्रादेशिक पक्षाचे लोकं सुद्धा दिल्लीतून नेतृत्व करताना पाहिलं आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

पवार राजकारणातले भीष्म पितामह

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मदतीसाठी जोर लावावा लागेल

केंद्र सरकारने काल राज्याला मदत जाहीर केल्याचं संसदेत सांगितलं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्या वर्षाची मदत आता मिळाली असेल तर या वर्षीच्या मदतीसाठी सर्व पक्षाच्या खासदार आणि केंद्रातील मंत्र्यांना जोर लावावा लागेल. ही तातडीची मदत आहे, असं मला मंत्र्यांच्या बोलण्यातून कळलं, असं ते म्हणाले. (shivsena leader sanjay raut slams devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, तो दिवस लवकरच उगवेल; संजय राऊतांचं ट्विट

VIDEO: राज्यपाल नेहमीच घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; संजय राऊत संतापले

(shivsena leader sanjay raut slams devendra fadnavis)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.