AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून छळ, धुळ्याचा जवान चंदू चव्हाणचा राजीनामा

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामा (Indian Soldier Chandu Chavan Resign) दिला आहे.

पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून छळ, धुळ्याचा जवान चंदू चव्हाणचा राजीनामा
| Updated on: Oct 06, 2019 | 12:24 PM
Share

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामा (Indian Soldier Chandu Chavan Resign) दिला आहे. चंदू चव्हाण यांनी याबाबतचा एक व्हीडिओ नुकतंच सोशल मीडियावर (Indian Soldier Chandu Chavan Resign) पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मी लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला कंटाळून असून राजीनामा देत असल्याचे (Indian Soldier Chandu Chavan Resign) म्हटलं आहे. मात्र चंदू चव्हाण यांचे हे आरोप लष्काराने फेटाळले आहेत.

लष्काराने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, “चंदूच्या विरोधात जवळपास पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच याबाबतच त्याच्या गुन्ह्याखाली कारवाईही सुरु आहे. काही निवडणुकांमध्ये चंदू हे राजकीय पक्षांना समर्थनार्थ प्रचार केल्याचेही समोर आले होते.” याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

नुकतंच चंदू चव्हाण हे नशेत सापडले होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. मात्र गेल्या 3 ऑक्टोबर 2019 पासून सुट्टी न घेता ते युनिटमधून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्त भंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती. सैन्यात अशाप्रकारे शिस्तभंग करण्याची परवानगी देत नाही, असंही सैन्याने सांगितले.

चंदू चव्हाण यांची काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली होती. “मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. मला गेल्या तीन वर्षांपासून अनेक समस्या लेखी स्वरुपात दिल्या आहे. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचं आहे, असही मी सांगितलं. मात्र माझं कोणीही ऐकलं नाही.” अशी तक्रार करत चंदू यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.

मी पाकिस्तानातून सुटल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले. मला न्याय मिळत नसल्याने मी त्रासाला कंटाळून राजीनामा देतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार असे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

चंदू चव्हाण हे धुळ्यातील बोरविहीरी गावातील रहिवासी आहेत. चंदू चव्हाण हे 29 सप्टेंबर 2016 रोजी नजरचुकीमुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर तब्बल 3 महिने 21 दिवसांनी म्हणजेच 21 जानेवारी 2016 रोजी त्यांची सुटका झाली होती.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...