AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळाव्याचं अन् नाभिक समाजाचं आहे खास कनेक्शन, हा पदार्थ खाताच नागा साधू करतात हिमालयात प्रस्थान

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे, मात्र तिसऱ्या शाही स्नानानंतर आता महाकुंभ मेळ्यात आलेल्या नागा साधुंच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

कुंभमेळाव्याचं अन् नाभिक समाजाचं आहे खास कनेक्शन, हा पदार्थ खाताच नागा साधू करतात हिमालयात प्रस्थान
| Updated on: Feb 10, 2025 | 10:06 PM
Share

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे, मात्र तिसऱ्या शाही स्नानानंतर आता महाकुंभ मेळ्यात आलेल्या नागा साधुंच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. नागा साधू कुंभ मेळाव्यातील फक्त तीन शाही स्नान करतात. वसंत पंचमीला तिसरं शाही स्नान पार पडलं, त्यानंतर आता नागा साधुंनी आपापल्या आखाड्यांकडे प्रस्थान केलं आहे. कोणी तपस्येसाठी हिमालयात निघाले आहेत, तर काही जणांनी इतर ठिकाणी प्रस्थान केलं आहे. मात्र यानंतर देखील कुंभमेळावा सुरूच राहणार आहे. मात्र नागा साधू आणि संतांनी महाकुंभ मेळाव्यातून आपल्या आखाड्यांकडे प्रस्थान केल्यानं औपचारिकरित्या महाकुंभ मेळाव्याची सांगता झाली असं मानलं जातं. मात्र साधू संत जेव्हा महाकुंभ मेळाव्याचा निरोप घेतात, त्यापूर्वी ते कढी आणि भजांचं सेवन करतात. जेव्हा नागा साधू पुन्हा एकदा आपल्या आखाड्याकडे प्रस्थान करतात त्यापूर्वी त्यांच्यासाठी खास कढी आणि भजे तयार केले जातात.

हे कढी-भजे तयार करण्याचं काम तेथील स्थानिक नाभिक समाज करतो. या परंपरेकडे गुरु-शिष्याची परंपरा म्हणून देखील पाहिलं जातं. कुंभ मेळाव्यात प्रत्येक आखाड्यामध्ये ही परंपरा पाहायला मिळते. नाभिक समाज मोठ्या श्रद्धेनं तेथील साधुंना जेऊ घालतो. कुंभ मेळाव्यात असलेल्या आखाड्यातील साधू-संताच्या संख्येनुसार हे कढी-भजे तयार केले जातात

कढी किती लीटर बनवली जाते?

जर आखाडा छोटा असेल तर अंदाजे 50-100 लीटर कढी बनवली जाते. मध्यम स्वरुपाचा आखाडा असेल तर 200-500 लीटर कढी बनवली जाते. जर आखाड्यां स्वरुप हे प्रचंड असेल तर 1000 लीटर पेक्षा अधिक कढी बनवली जाते. तेवढ्याच प्रमाणात भजे देखील तयार केले जातात. नागा साधू कुंभ मेळाव्यातून पुन्हा आपल्या मुळ ठिकाणी परताना कढी भजे खातात व त्यानंतरच ते प्रस्थान करतात. त्याशिवाय ते प्रस्थान करत नाहीत. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे.

भारतात कढी, भजाला कधीपासून सुरुवात झाली?

कढी आणि भजे या पदार्थांचा समावेश भारतामधील प्राचीन पदार्थांमधे होतो. अनेक प्राचीन ग्रथांमध्ये सुद्धा या दोन पदार्थांचा उल्लेख आढळतो. हे दोन पदार्थ राज्यस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जातात.मात्र प्रत्येक राज्यामध्ये त्याची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.