AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा चीनला दणका, थेट भूतान येणार भारतीय रेल्वेच्या नकाशावर, ज्याची भीती तेच घडतंय..

भारत आणि भूतान रेल्वे मार्ग चीनसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही केवळ एकच रेल्वे लाईन नाही, तर दोन रेल्वे मार्ग उभारले जाणार आहेत. आजवर भूतानमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध नाही. त्यातच सरकारने घेतलेल्या निर्णयाने चीनला मोठा धक्का बसला.

भारताचा चीनला दणका, थेट भूतान येणार भारतीय रेल्वेच्या नकाशावर, ज्याची भीती तेच घडतंय..
India Bhutan Railway Line
| Updated on: Aug 30, 2026 | 9:44 AM
Share

भारत भूतानमध्ये रेल्वे मार्ग उभारणार आहे. हा चीनसाठी मोठा धक्का आहे. त्यातच भारताने चीनला मिरच्या लागणारा निर्णय घेतला. मुळात भारत आणि भूतान रेल्वे मार्गच चीनला पटत नाही.  ही केवळ एकच रेल्वे लाईन नाही, तर दोन रेल्वे मार्ग उभारले जाणार आहेत. आजवर भूतानमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध नाही. तिथे यापूर्वी कधीही रेल्वे मार्ग अस्तित्वात नव्हता. भारत भूतानला दोन दिशांनी रेल्वे जाळ्याशी जोडणार आहे. याकरिता 4000 कोटी  रुपये खर्च येणार आहे. भारतीय रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाने भारत भूतान सीमा कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्यासाठी काम अधिक जलद केले. सरकारने सिक्किमच्या 2027 आणि भूटानच्या 2029 रेल्वे सेवा सुरू करण्याचे टार्गेट ठरवले आहे. भारत सरकारचा हा निर्णय चीनचे टेन्शन वाढवणारा आहे. चिकन नेकवर लक्ष ठेवणाऱ्या चीनसाठी हा धक्का आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत भूतानला जोडण्यासाठी 69 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय रेल्वे लाईनसाठी भारत सरकार 3500 कोटी खर्च करत आहे. सरकारने आता या रेल्वे लाईनला विशेष योजनेचा दर्जा दिला आहे. अडचणी आणि जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला.

लवकरच दोन्ही देशात ही महत्वाची रेल्वे लाईन तयार होईल, ज्यामुळे व्दिपक्षीय संबंध आणि व्यापाराला नवी दिशा मिळेल. भूतानच्या गेलेफू माइंडफुलनेस शहराला थेट जोडले जाईल. ज्यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल. सीमेवरही काही गोष्टी बदलतील. चीनला ही रेल्वे लाईन अजिबात पटत नाही. मात्र, शेवटी चीनच्या हातात काही नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून चीन सीमेवर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. चीन भारताच्या हद्दीत प्रवेश करत असल्याचाही आरोप केला जात आहे. भारत आणि चीनमध्ये मोठी सीमा आहे. अरूणाचल प्रदेशमधील सीमा भागात राहणारे लोक चीन भारतीय जमिनीवर ताबा मिळवत असल्याचे सांगत आहेत. भारतही आता सीमा भागात आपली ताकद निर्माण करत आहे. त्यातच चीनला एका मागून एक धक्के भारत देत आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक