AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला, घराला भीषण आग, भाजप हादरला; मंत्री घरी नव्हते म्हणून…

केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह ऊर्फ आरके सिंह यांच्या घरालाच लक्ष्य करण्यात आलं आहे. इंफाळमधील संतप्त जमावाने काल रात्री सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांच्या घराचं नुकसान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला, घराला भीषण आग, भाजप हादरला; मंत्री घरी नव्हते म्हणून...
Union minister RK Ranjan SinghImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2023 | 9:03 AM
Share

इंफाळ : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये थांबून थांबून हिंसा होत आहे. या हिंसक आंदोलकांनी आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच टार्गेट केलं आहे. हिंसक आंदोलकांनी आरके रंजन सिंह यांच्या घरालाच आग लावली आहे. मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांचं घर जाळलं आहे. मात्र, सिंह हे घरी नव्हते, त्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इंफाळमध्ये संचारबंदी लागू असतानाही जमावाने संचारबंदी झुगारून केंद्रीय मंत्र्याच्या घरावर धडक दिली. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त असतानाही जमावाने मंत्र्याचं घर पेटवून दिलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाजप हादरून गेला आहे.

मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यापासून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील हिंसेचा आढावा घेतला होता. अधिकारी आणि काही प्रतिष्ठीत लोकांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात हिंसा भडकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्यातील हिंसाचार पाहता स्थानिक आमदारांनी आपल्या घराबाहेर एक बॉक्स ठेवला आहे. लुटमार करून आणलेली आणि हिसकावून आणलेली हत्यारे या बॉक्समध्ये टाका, असं या बॉक्सवर लिहिण्यात आलं आहे. नागरिकांनी हिंसा करू नये म्हणून आमदारांनी ही शक्कल लढवली आहे.

केरळला होते म्हणून…

केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकताच आगीने पेट घेतला आणि घरभर आग पसरली. घराला आग लागताच घरातील लोक तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. आंदोलकांनी थेट मंत्र्यांच्याच घराला लक्ष्य केल्याने राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मंत्री राजकुमार सिंह हे केरळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातून ते बचावले आहेत.

सुदैवाने सर्व सुरक्षित

केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर माझ्या राज्यात जे काही होतंय ते पाहून मला दु:ख झालं आहे. आता सर्वांनी शांतता राखावी असं माझं आवाहन आहे. असा प्रकारच्या हिंसेत जे लोक सहभागी झाले आहेत, ते अमानवी आहे, असं केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांनी सांगितलं.

मी एका कामानिमित्ताने केरळला आलेलो आहे. काल रात्री इंफाळ येथील माझं घर पेटवून दिलंय. सुदैवाने त्यात कोणताही जीवित हानी झाली नाही. हिंसक लोक पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते. त्यांनी घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यामुळे लागलेल्या आगीत माझ्या घराच्या तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.