AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत आता दिले असे आदेश

ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वानाथ मंदिर प्रकरणावर वाराणसी जिल्हा कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे बऱ्याच गोष्टी येत्या काळात उघड होण्याची शक्यता आहे.

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत आता दिले असे आदेश
Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कोर्टाने दिला असा आदेश, मुस्लिम पक्षाला मोठा धक्का
| Updated on: Jul 21, 2023 | 5:07 PM
Share

वाराणसी : ज्ञानवापी-काशी विश्वनाथ प्रकरण गेल्या काही दिवसांपासून कोर्टात आहे. या प्रकरणावर आता वाराणसी कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिक फेटाळत एएसआय सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं आहे की, “एएसआय सर्व्हेदरम्यान परिसरात नमाज होत राही.” तसेच सर्व्हेचं काम तीन ते सहा महिन्यांच्या आत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. पण कोर्टाच्या या निर्णयानंतर मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुस्लिम पक्षाने सांगितलं आहे की, “न्यायालयाच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ.”

हिंदू पक्षाच्या वकिलांनी काय सांगितलं?

हिंदू पक्षाची कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकील विष्णु शंकर यांनी सांगितलं की, “कोर्टाने वजू टँक परिसर सोडून ज्ञानवापी परिसराचा एएसआय सर्व्हे करण्यास सांगितलं आहे. वजू टँक सध्या सील करण्यात आला आहे. मला वाटतं सर्व्हे तीन ते सहा महिन्यात पूर्ण होईल.” दुसरीकडे हिंदू पक्षाच्या बाजून उभे असलेल्या वकील सुभाष नंदन यांनी सांगितलं की, “एएसआय सर्व्हे करण्याची याचिका स्वीकारली गेली आहे. या प्रकरणाचा हा टर्निंग प्वॉइंट असेल.”

मुस्लिम पक्षाने कसा केला होता युक्तिवाद

या प्रकरणी यापूर्वी 12 आणि 14 जुलैला सुनावणी झाली होती. तेव्हा मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी सर्व्हेक्षण करण्यास विरोध केला होता. “ज्ञानवापी परिसराचं पुरातत्व सर्व्हेक्षण केलं तर मूळ स्ट्रक्चरचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे या परिसरात सर्व्हे करू नका. हिंदू पक्षाकडून पुरावे जमा केले जात आहेत ते कायदेशीर नाहीत.” असा युक्तिवादही मुस्लिम पक्षाकडून केला गेला.

हिंदू पक्षाने आपली बाजू कशी मांडली?

हिंदू पक्षाने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की, “ज्ञानवापी परिसराचं सर्व्हेक्षण करणं आवश्यक आहे. यामुळे खरी बाजू उघड होईल. तसेच ज्ञानवापी प्रकरणाचा तणाव सामंजस्यपणे सोडवणं गरजेचं आहे. ज्ञानवापी परिसराचं वैज्ञानिक तथ्य समोर येणं गरजेचं आहे.”

Follow Us
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल