AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक तासात असा कोणता झाला आजार? उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याने देशभरात एकच सवाल, जगदीप धनखड कशामुळे नाराज?

Jagdeep Dhangad Resignation : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य तक्रारीचे कारण पुढे करत राजीनामा दिला. या अचानक राजीनाम्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. एका तासातच उपराष्ट्रपतींना असा कोणता आजार झाला की, त्यांनी राजीनामा दिला असा सवाल त्यांनी केला.

एक तासात असा कोणता झाला आजार? उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याने देशभरात एकच सवाल, जगदीप धनखड कशामुळे नाराज?
राजीनाम्यावर विरोधकांचा सवालImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 22, 2025 | 8:49 AM
Share

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. आरोग्याच्या कुरबुरीने राजीनामा देत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपावला. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे. एका तासातच असा कोणता आजार झाला की, त्यांना राजीनामा द्यावा लागला असा सवाल विरोधक विचारत आहेत. तर धनखड यांच्या आरोग्याविषयी सुद्धा विरोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसचे खासदार इमरान मसूदसह इतर अनेक नेत्यांनी याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

“ते संपूर्ण वेळ संसद भवनात होते. मग केवळ एका तासात असे झाले तरी काय की त्यांना राजीनामा द्यावा लागला? ते लवकर बरे होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे. पण मला राजीनाम्यामागील कारण समजले नाही.” उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

त्यांच्या राजीनाम्याने मला दुःख – कपिल सिब्बल

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने मला दुःख झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दिली. त्यांच्यासोबत माझे वैयक्तिक ऋणानुबंध होते. माझ्या कुटुंबियांशी, त्यांच्या कुटुंबियांचे चांगले संबंध होते. माझ्या वडिलांसोबत पण त्यांची चांगली मैत्री होती, असे सिब्बल म्हणाले. मी नेहमी त्यांचा आदर करतो. त्यांनी मला कधी दुखावले नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभो. ते आरोग्यदायी जीवन जगो अशी मी प्राथर्ना करतो, असे सिब्बल म्हणाले.

राजीनाम्यामागे राजकीय अस्वस्थता – मल्लू रवी

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस खासदार मल्लू रवी यांनी सरकारला खोचक टोला लगावला. उपराष्ट्रपतींनी विना कोणती तक्रार गेल्या दोन दिवसात राज्यसभेचे कामकाज पूर्ण केले. त्यावेळी त्यांनी कोणतीही शारीरिक तक्रार असल्याचा उल्लेख केला नाही. पण अचानक आरोग्याचे कारण पुढे करत त्यांनी राजीनामा दिल्याने आम्हाला चिंता वाटत आहे. मला वाटते ही आरोग्याची नाही तर राजकीय अस्वस्थता आहे. खासकरून बिहार निवडणुकीपूर्वी सरकार त्यांच्या खास व्यक्तीला या पदावर बसवू इच्छित आहे, ज्यामुळे त्यांना बिहार निवडणुकीत फायदा होईल, अशी प्रतिक्रिया मल्लू रवी यांनी व्यक्त केली.

Follow Us
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...