AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Gas e-KYC : गॅस हवा असेल तर e-KYC गरजेची? नेमका दावा काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती!

गॅस सिलंडरच्या बुकिंगसाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे असा दावा केला जात होता. यामुळेच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

LPG Gas e-KYC : गॅस हवा असेल तर e-KYC गरजेची? नेमका दावा काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती!
gas booking e kycImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2026 | 3:49 PM
Share

LPG Cylinder e-KYC : सध्या एलपीजी गॅस सिलिंडरचा देशभरात तुटवडा निर्माण झाला आहे. इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भारतापुढे हा पेच निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाहीये. विशेष म्हणजे लोक गॅस वितरण केंद्रावर रिकामा सिलिंडर घेऊन घेऊन रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावा यासाठी सरकारने अनेक नियमांत बदल केला आहे. या बदलामुळेही लोकांची अडचण झाली झाली आहे. आता एक गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर दुसरा गॅस सिलिंडर 25 दिवसांनीच बुक करता येतोय. यासह पीएनजीचे कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर दिले जात नाहीये. असे असतानाच आता गॅस सिलिंडरच्या बुकिंगसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. अलीकडेच ई-केवायसीबाबत एक दावा केला जात होता. या दाव्यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

नेमका संभ्रम काय?

गॅस सिलिंडरसाठी प्रत्येकाने ई-केवायसी करणे गरजेचे आहे, असा दावा काही ठिकाणी केला जात होता. तसे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. या दाव्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आता हाच संभ्रम दूर व्हावा यासाठी सरकारने ई-केवायसीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एलपीजी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजेच ई केवायसीची प्रक्रिया सर्वांसाठीच लागू नाही. ज्या लोकांनी ही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनाच फक्त ही केवायसी करायची आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारने काय स्पष्टीकरण दिले?

सोबतच हा नियम आता लागू केलेला नाही. तो खूप दिवसांपासून लागू आहे, असेही पेट्रेलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याआधी ई केवायसी न केलेल्या ग्राहकांनाच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सोबतच तुम्ही पीएमयूवाय योनजेचे लाभार्थी नसाल आणि केवायसी केलेली असेल तर तुम्हाला आता पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही, असेही सरकारने सांगितले आहे. तर पीएमयूवाय योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रत्येक वर्षाला केवायसी करावी लागते. ही केवायसी सबसीडी मिळावी यासाठी गरजेची आहे. आठव्या आणि नवव्या गॅस बुकिंगवेळी सबसीडी मिळावी म्हणून या योजनेअंतर्गत सातव्या गॅस बुकिंगच्या वेळी केवायसी करावी लागते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Follow Us
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?