AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीदासाठी निश्चित झालं आहे. थोड्याच वेळात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही होणार आहे. (Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?
Sukhjinder Singh Randhawa
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 4:52 PM
Share

चंदीगड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीदासाठी निश्चित झालं आहे. थोड्याच वेळात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही होणार आहे. रंधावा हे गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे समजले जात आहेत. शिवाय ते नवज्योतसिंग सिद्धू यांचेही निकवर्तीय समजले जात आहेत. (Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)

सुखजिंदरसिंग रंधावा हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात आहेत. ते पंजाब सरकारमध्ये सहकार आणि तुरुंग प्रशासन मंत्री आहेत. तसेच त्यांनी पंजाबमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

तीनदा विजयी

रंधावा हे गुरुदासपूर जिल्ह्याचे रहिवासी आहे. ते बाबा नानक विधानसभा मतदारसंघातून 2002, 2007 आणि 2017 मध्ये निवडून आले आहेत. ते राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरीही होते.

वडील काँग्रेसचे अध्यक्ष

रंधावा यांच्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये आहेत. त्याचे वडील संतोख सिंग दोन वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पंजाबमधील काँग्रेसचे बडे नेते म्हणून ते परिचित होते. रंधावा यांनी वडिलांकडूनच राजकारणाचं बाळकडू घेतलं.

कॅप्टन विरोधात बंड

रंधावा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी सिद्धूंसह कॅप्टन अमरिंदर सिंग विरोधात बंड पुकारलं होतं. रंधावा स्वत: मंत्री असतानाही अमरिंदर सरकार निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत होते.

बादल परिवाराशीही पंगा

आक्रमक नेते म्हणून रंधावा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी बादल कुटुंबाच्या विरोधातही आक्रमक पवित्रा घेतला होता. 2015मध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अवमान झाल्यानंतर आंदोलन झालं होतं. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आरोपींवर गुन्हे दाखल न केल्याने रंधावा यांनी मोठं आंदोलन केलं होतं. तसेच त्यांनी बादल कुटुंबावरही या प्रकरणी जोरदार हल्लाबोल केला होता.

गटबाजी रोखण्यासाठी निर्णय

सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.

उद्या शपथविधी

दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. रंधावा मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)

संबंधित बातम्या:

सुखजिंदरसिंग रंधावा पंजाबचे नवे ‘सरदार’, मुख्यमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा; सोनिया गांधींकडे खलबतं सुरू

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा; अमरिंदर सिंग यांनी थेट हायकमांडला ललकारले

(Who is Sukhjinder Singh Randhawa?, read about senior politicians)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.