AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतामधील पोस्ट बॉक्स लालच का असतो? जाणून घ्या मागचं खरं कारण !

पोस्ट बॉक्सचा हा लाल रंग काही फक्त सौंदर्यापुरता नाही, तर यामागे आहे एक जुना इतिहास, वैज्ञानिक कारणं आणि ब्रिटिश काळातील परंपरा. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत या लाल पत्रपेटीचा संपुर्ण इतिहास आणि तो आजही कसा टिकून आहे.

भारतामधील पोस्ट बॉक्स लालच का असतो? जाणून घ्या मागचं खरं कारण !
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 5:34 PM
Share

आपण रस्त्यावरून जाताना हमखास एखाद्या कोपऱ्यावर किंवा पोस्ट ऑफिससमोर उभा असलेला एक लाल रंगाचा पत्रपेटी पाहिला असेल. पण कधी विचार केला आहे का की ही पत्रपेटी लाल रंगाचीच का असते? नेहमीसारखा विषय वाटत असला, तरी यामागे इतिहास, विज्ञान आणि प्रशासनिक निर्णय यांचा एक जुना संदर्भ लपलेला आहे.

भारतात डाक सेवा अर्थात पोस्टल सर्व्हिसची सुरुवात ब्रिटीश काळात झाली होती. 1854 साली लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात ही सेवा सुरु करण्यात आली. त्या काळात पत्रव्यवहार हेच आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याचं एकमेव आणि विश्वासार्ह साधन होतं. मात्र, सुरुवातीच्या काळात या पत्रपेट्यांचा रंग लाल नसून हिरवा होता.

ब्रिटीश शासनाच्या प्रारंभीच्या काळात हिरव्या रंगाचे पोस्ट बॉक्स वापरले जात होते. मात्र, हिरवा रंग नैसर्गिक वातावरणात सहज मिसळतो आणि त्यामुळे लोकांना त्याचे स्थान शोधणं कठीण जायचं. या अडचणींमुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर, 1874 साली म्हणजेच पोस्टल सेवेला सुरुवात होऊन २० वर्षांनी, एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे पोस्ट बॉक्सचा रंग लाल करण्याचा!

या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण भारतभर करताना जवळपास 10 वर्षे लागली. मात्र एकदा का लाल रंगाचा वापर सुरू झाला, तेव्हा त्याचे फायदे लगेच दिसून आले.

लाल रंगामागचं विज्ञान

लाल रंगाची निवड ही केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून नव्हती. या रंगाचं एक वैज्ञानिक कारणही आहे. लाल रंगाच्या लाटांची लांबी (वेव्हलेंथ) सर्व रंगांमध्ये सर्वात जास्त असते आणि त्याची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते. त्यामुळे हा रंग लांबूनही स्पष्टपणे दिसतो. याशिवाय, लाल रंग अत्यंत लक्षवेधी आणि इमर्जन्सी संकेतांमध्ये वापरण्यात येणारा रंग आहे, जो डाकसेवेच्या महत्त्वाचं प्रतीक ठरतो.

ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावामुळे केवळ भारतातच नव्हे, तर इतर अनेक राष्ट्रांमध्येही लाल रंगाचे पोस्ट बॉक्स वापरले गेले. अर्थात काही देशांमध्ये त्यांच्या गरजेनुसार वेगळ्या रंगांचे पोस्ट बॉक्स वापरले जातात.

वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे रंग

आजही लाल रंगाचं महत्त्व अबाधित आहे. मात्र, भारतीय डाक विभागाने काही विशिष्ट सेवांसाठी वेगळ्या रंगांचे पत्रपेट्या सुरू केल्या आहेत:

1. हिरवा रंग: स्थानिक (लोकल) पत्रव्यवहारासाठी

2. निळा रंग: मेट्रो शहरांमध्ये जाणाऱ्या पत्रांसाठी

3. पिवळा रंग: राज्यांच्या राजधानीत जाणाऱ्या पत्रांसाठी

तरीही, सामान्य रस्त्यांवर दिसणाऱ्या पोस्ट बॉक्सपैकी बहुतांश अजूनही पारंपरिक लाल रंगाचेच आहेत.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता