350 किलोमीटरचं अंतर अवघ्या 50 तासांत कापलं! हा अट्टाहास का? उत्तर वाखाण्यासारखंय!

सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करण्याच्या उद्देशानं तो धावत होता. पण आता आणखी एक चकीत करणारा एका प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चकीत करणारा असला तरिही तितकाच वाखाण्याजोगा आणि कौतुकास्पदही आहे.

350 किलोमीटरचं अंतर अवघ्या 50 तासांत कापलं! हा अट्टाहास का? उत्तर वाखाण्यासारखंय!
सैन्यात भरती नाही झाली म्हणून एकानं चक्क 350 किलोमीटर अंतर हे धावून पार केलंImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:45 AM

मुंबईः सैन्यात भरती होण्यासाठी धावणारा प्रदीप (Pradip) तुम्हाला आठवत असेलच. दिवसभर काम करायचा आणि रात्री दहा किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचा किस्साही भारीच होता. सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करण्याच्या उद्देशानं तो धावत (Running) होता. पण आता आणखी एक चकीत करणारा एका प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चकीत करणारा असला तरिही तितकाच वाखाण्याजोगा आणि कौतुकास्पदही आहे. सैन्यात भरती (Indian Army) नाही झाली म्हणून एकानं चक्क 350 किलोमीटर अंतर हे धावून पार केलं आहे. अवघ्या 50 तासांत सैन्य भरतीत निवड न झालेल्या या तरुणानं हे अंतर कापलं आहे. हा मुलगा आहे राजस्थानचा. सैन्यात भरती होण्यासाठी आला. सैन्य भरतीत यश आलं नाही म्हणून चक्क धावत सुटला. धावून 350 किलोमीटर अंतर अवघ्या 50 तासात पूरं करण्याची किमया या तरुणानं करुन दाखवली आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोणंय हा राजस्थानी मुलगा?

एखादी गोष्ट साध्य करता आली नाही, तर लोकं निराश होतात. वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही खचूनही जातात. पण या तरुणानं चक्क धावत जात 350 अंतर कापण्याची किमया का करुन दाखवली, असा प्रश्नही अनेकांना पडलाय. या तरुणाचं नाव सुरेश भिंचर आहे. सुरेश 24 वर्षांचा आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील या तरुणाला भारतीय सैन्यात सामील व्हायचं होतं. गेल्या दोन वर्षांपासून तो त्यासाठी प्रयत्न करत होता.

मग धावला कशासाठी?

आपलं सिलेक्शन झालं म्हणून सुरेश धावत सुटला. सलग धावला. त्याच्या धावणं निरर्थक निश्चितच नव्हतं. आता तो नेमका धावला का, हे जाणून घेणंही महत्त्वाचंय.

सुरेशनं आपल्या धावण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे. आपल्या धावत जाण्यामागे एक संदेश त्याला द्यायचाय. हा संदेशही फार खास आहे. सुरेश सारखे अनेक जण सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. पण अनेक जण सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. भरती प्रक्रिया कधी सुरु होणार, याची वाट पाहत आहेत. पण अनेकांच वय हातातून निघून चाललंय. ही भरती निघावी म्हणून दिल्लीत निदर्शनं करण्यात आली होती. या निदर्शनांत सुरेशनं केलेलं अनोखं निदर्शन हे या तरुणांची उमेद वाढवण्यासाठी केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न होता. मुलांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी सुरेशची धाव ही अत्यंत महत्त्वाची होती. म्हणून प्रदीपच्या धावण्यानंतर सुरेशची धावही तितकीच अर्थपूर्ण आणि वाखाण्याजोगी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

संबंधित बातम्या 

श्रीलंकेतील पंतप्रधानांच्या कुटुंबियांचे देशातून पलायन; आणीबाणीत 56 जणांना सोडवण्यासाठी 600 वकील न्यायालयात 

RR vs RCB Result IPL 2022: Dinesh Karthik ने अश्विनची गोलंदाजी फोडली, तिथेच सामना फिरला, RCB चा रोमांचक विजय

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.