AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Corona Update : कोरोना रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य खात्याच्या महत्वाच्या सूचना, काय आहेत नव्या गाईडलाईन्स?

कोविडच्या रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही, तर तो आठव्या दिवसापासून तो रुग्ण कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. म्हणजे जर तुम्हाला कोरोना होऊन 7 दिवस झाले असतील, आणि त्यापैकी सलग 3 दिवस तुम्हाला ताप आलेला नसेल, तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मानलं जाईल.

India Corona Update : कोरोना रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य खात्याच्या महत्वाच्या सूचना, काय आहेत नव्या गाईडलाईन्स?
कोरोना
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 07, 2022 | 11:00 PM
Share

नवी दिल्ली : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी केंद्र सरकारनं (Central Government) कोरोना रुग्णांसाठी काही सूचना (Corona Guidelines) जारी केल्या आहेत. ज्या लोकांना कोरोना झाला आहे आणि ते सध्या घरीच उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी केंद्रानं जारी केलेल्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत.

..तर तुम्ही कोरोनामुक्त आहात!

कोविडच्या रुग्णाला आयसोलेशनदरम्यान सलग 3 दिवस ताप आला नाही, तर तो आठव्या दिवसापासून तो रुग्ण कोरोना निगेटिव्ह मानला जाईल. म्हणजे जर तुम्हाला कोरोना होऊन 7 दिवस झाले असतील, आणि त्यापैकी सलग 3 दिवस तुम्हाला ताप आलेला नसेल, तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मानलं जाईल.

ऑक्सिजन पातळी 93 वर गेली… काळजी नाही

दुसरी महत्वाची सूचना ही ऑक्सिजन पातळीबाबत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची पातळी 95 हून खाली गेली तरी अनेकांना भीती वाटायची. मात्र आता नव्या गाईडलाईन्सनुसार जर कोरोना बाधिताची ऑक्सिजन पातळी ही 93 पर्यंत जरी खाली गेली, तरी चिंतेची गरज नाही. म्हणजे तुम्हाला श्वसनाचा त्रास नसेल, आणि घरातल्या बंद खोलीत तुमची ऑक्सिजन पातळी 93 वर गेली असेल, तरी ती सामान्य पातळी म्हणून समजली जाईल. याचा अर्थ अश्या रुग्णाची सुद्धा सौम्य लक्षणं असलेला रुग्ण म्हणून नोंद होईल.

आयसोलेशन कालावधीही 7 दिवसांवर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी घरात आयसोलेट होण्याचा काळ 15 दिवसांचा होता. त्या पंधरा दिवसानंतर अनेकांना कोरोना चाचणी करावी लागत होती. जर ती चाचणी निगेटिव्ह आली, तरच त्या रुग्णाची नोंद कोरोनामुक्त म्हणून होत होती. मात्र यावेळी होम आयसोलेशन कार्यकाळ फक्त 7 दिवसांचा करण्यात आला आहे. त्यातही सलग 3 दिवस ताप आला नाही, तर आठव्या दिवसांपासून तुम्हाला पुन्हा कोरोना चाचणी बंधनकारक असणार नाही.

केंद्राच्या कोरोना गाईडलाईन्समध्ये इतकी शिथीलता देण्यामागचं कारण ओमिक्रॉन व्हेरियंट आहे. एका माहितीनुसार सध्या देशात रोज जितके रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी 60 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे आहेत. आतापर्यंतच्या बहुतांश ओमिक्रॉन बाधितांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळेच गाईडलाईन्समध्येही शिथिलता देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू

नाना पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश, वाद पेटणार?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली