AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : 40 एकरातील ऊसाला आग, …तर टळली असती दुर्घटना

धुळे : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी बीड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेक ठिकाणी वेळेत तोड झाली नाही. त्यामुळे कालावधी पूर्ण होऊनही ऊस फडातच आहे. धुळे जिल्ह्यातील जुने कोडदे शिवारातील ऊसाची वेळेत तोड झाली असती तर 40 एकरातील ऊस जळून खाक झालाच नसता. दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे उसाच्या क्षेत्राला चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली मात्र, नुकसान टाळता आले नाही.

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:06 PM
Share
40 एकरातील ऊस जळून खाक जुने कोडदे गाव शिवारातील ऊसाला अचानक सोमवारी सकाळी आग लागली. सध्या ऊस तोडणीला आला असल्याने ऊसाचे पाचरट हे वाळलेले आहे. त्यामुळे काही क्षणात आगीने 40 एकरातील ऊस कवेत घेतला. शेतकऱ्यांचे न भरुन  निघणारे नुकसान झाले आहे.

40 एकरातील ऊस जळून खाक जुने कोडदे गाव शिवारातील ऊसाला अचानक सोमवारी सकाळी आग लागली. सध्या ऊस तोडणीला आला असल्याने ऊसाचे पाचरट हे वाळलेले आहे. त्यामुळे काही क्षणात आगीने 40 एकरातील ऊस कवेत घेतला. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

1 / 4
ऊसतोडीचा कालावधी संपला होता: लागवड केल्यापासून 12 महिन्यांनी ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. यंदा ऊस गाळपात वाढ झाली असली तरी वाढीव क्षेत्रामुळे अजूनही ऊस फडातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. वेळेत ऊसाची तोड झाली असती तर दोंडाईचा येथील जुने कोळदे शिवारात हे नुकसान झाले नसते.

ऊसतोडीचा कालावधी संपला होता: लागवड केल्यापासून 12 महिन्यांनी ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. यंदा ऊस गाळपात वाढ झाली असली तरी वाढीव क्षेत्रामुळे अजूनही ऊस फडातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. वेळेत ऊसाची तोड झाली असती तर दोंडाईचा येथील जुने कोळदे शिवारात हे नुकसान झाले नसते.

2 / 4
शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ : सकाळच्या प्रहरीच आग लागल्याने काही वेळेतच शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग आटोक्याचा सर्वकश प्रयत्न केले मात्र, वारे आणि वाळलेले पाचट यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयत्न हे निष्फळ ठरले.

शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ : सकाळच्या प्रहरीच आग लागल्याने काही वेळेतच शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग आटोक्याचा सर्वकश प्रयत्न केले मात्र, वारे आणि वाळलेले पाचट यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयत्न हे निष्फळ ठरले.

3 / 4
अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी :  गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील दुर्घटना टळली मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. ऊसाबरोबरच इतर शेती साहित्याचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी : गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील दुर्घटना टळली मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. ऊसाबरोबरच इतर शेती साहित्याचे नुकसान झाले आहे.

4 / 4
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.