AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS IPS EXAM: फक्त 1 वर्ष तयारी आणि 22 व्या वर्षी आएएएस, हे गुपित आहे तरी काय?

अनन्या म्हणते की, प्री अँड मेन्स परीक्षेच्या आधीचा काळ खूप कठीण आहे आणि या काळात कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे

| Updated on: Oct 12, 2022 | 12:51 PM
Share
आयएएस, आयपीएस होण्याचं स्वप्न बऱ्याच लोकांचं असतं. हे स्वप्न पाहात पाहात तर काहींचं वय निघून जातं, पण पहिल्याच प्रयत्नात काही जण हे मिळवतात, त्यापैकी एक आहे अनन्या सिंग! अनन्या सिंगने तिचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराजच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून केले आणि सुरुवातीपासूनच ती अभ्यासात खूप हुशार होती.

आयएएस, आयपीएस होण्याचं स्वप्न बऱ्याच लोकांचं असतं. हे स्वप्न पाहात पाहात तर काहींचं वय निघून जातं, पण पहिल्याच प्रयत्नात काही जण हे मिळवतात, त्यापैकी एक आहे अनन्या सिंग! अनन्या सिंगने तिचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराजच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून केले आणि सुरुवातीपासूनच ती अभ्यासात खूप हुशार होती.

1 / 7
अनन्याने दहावीत ९६ टक्के आणि बारावीत ९८.२५ टक्के गुण मिळवले होते. दहावी आणि बारावी या दोन्ही ंमध्ये अनन्या सीआयएससीई बोर्डातून जिल्हा टॉपर होती. त्यानंतर अनन्यानं दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आणि इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

अनन्याने दहावीत ९६ टक्के आणि बारावीत ९८.२५ टक्के गुण मिळवले होते. दहावी आणि बारावी या दोन्ही ंमध्ये अनन्या सीआयएससीई बोर्डातून जिल्हा टॉपर होती. त्यानंतर अनन्यानं दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आणि इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

2 / 7
अनन्या सिंगला लहानपणापासूनच आयएएस अधिकारी बनून देशसेवा करायची होती. पदवीच्या शेवटच्या वर्षात तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. अनन्या सिंग यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवातीला रोज ७-८ तास अभ्यास करायची. नंतर नंतर तिने अभ्यासाचा वेळ कमी केला आणि रोज ६ तास तो निश्चित केला. मात्र तिने एक काळजी घेतली कोणत्याही दिवशी 6 तासांपेक्षा कमी वेळ अभ्यास केला नाही.

अनन्या सिंगला लहानपणापासूनच आयएएस अधिकारी बनून देशसेवा करायची होती. पदवीच्या शेवटच्या वर्षात तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. अनन्या सिंग यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवातीला रोज ७-८ तास अभ्यास करायची. नंतर नंतर तिने अभ्यासाचा वेळ कमी केला आणि रोज ६ तास तो निश्चित केला. मात्र तिने एक काळजी घेतली कोणत्याही दिवशी 6 तासांपेक्षा कमी वेळ अभ्यास केला नाही.

3 / 7
अनन्या म्हणते की, प्री अँड मेन्स परीक्षेच्या आधीचा काळ खूप कठीण आहे आणि या काळात कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे. एका रिपोर्टनुसार, अनन्या सिंगने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी टाइम टेबल बनवलं होतं आणि ते लक्षात घेऊनच तिने नेहमी अभ्यास केला .

अनन्या म्हणते की, प्री अँड मेन्स परीक्षेच्या आधीचा काळ खूप कठीण आहे आणि या काळात कठोर परिश्रम करणे महत्वाचे आहे. एका रिपोर्टनुसार, अनन्या सिंगने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी टाइम टेबल बनवलं होतं आणि ते लक्षात घेऊनच तिने नेहमी अभ्यास केला .

4 / 7
युपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अनन्यानं आधी पुस्तकांची यादी तयार केली आणि अभ्यासक्रमानुसार पुस्तकं वाचली. यावरून तिने तिच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या.

युपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अनन्यानं आधी पुस्तकांची यादी तयार केली आणि अभ्यासक्रमानुसार पुस्तकं वाचली. यावरून तिने तिच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या.

5 / 7
अनन्या म्हणते की नोट्स बनवण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे नोट्स लिहिल्यामुळे लिहितानाच मनात उत्तरं नोंदली जातात. याबरोबरच ते शॉर्ट आणि स्वीट होतात म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जातं.

अनन्या म्हणते की नोट्स बनवण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे नोट्स लिहिल्यामुळे लिहितानाच मनात उत्तरं नोंदली जातात. याबरोबरच ते शॉर्ट आणि स्वीट होतात म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जातं.

6 / 7
अनन्या सिंगने पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अनन्याने केवळ एक वर्ष सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने २०१९ मध्ये नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतात ५१ वा क्रमांक मिळविला आणि आयएएस अधिकारी बनली.

अनन्या सिंगने पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अनन्याने केवळ एक वर्ष सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने २०१९ मध्ये नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतात ५१ वा क्रमांक मिळविला आणि आयएएस अधिकारी बनली.

7 / 7
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.