राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने 373 वर्षांनी अक्कलकोट जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज ढासळला आहे.
1 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे 373 वर्षांनी अक्कलकोट जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज कोसळला आहे.
2 / 7
छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पुत्र) यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती.
3 / 7
रात्रीपासून शहर आणि जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
4 / 7
कोल्हापुरातही पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होतं. मात्र, आता पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे.
5 / 7
लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरुच आहे. ढगाळ वातावरण आणि गारठा पसरला आहे.
6 / 7
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे.