AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabodhankar Thackeray Death Anniversary | महाराष्ट्राचे ‘प्रबोधन’ करणारे प्रबोधनकार, जाणून घ्या त्यांच्या बद्द्लच्या खास गोष्टी

केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 3:12 PM
Share
सत्यशोधक आंदोलनातले एक धडाडीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून सर्वश्रूत असणारे लेखक म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ,  शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

सत्यशोधक आंदोलनातले एक धडाडीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून सर्वश्रूत असणारे लेखक म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

1 / 7
प्रबोधनकारांचा जन्म  १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगडमधील पाली येथे झाला. अष्टविनायकमधील पालीचा गणपती त्यांचे कूलदैवत असल्याचा उल्लेख काही कागदपत्रात मिळतो. त्यांच्या  जडणघडणीत वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. त्यांच्या आईने त्यांना स्वाभिमानाचे संस्कार दिले. एकदा त्यांच्या वडिलांना ल़ॉटरी लागली होती तेव्हा  लॉटरी ७५ रुपयांची होती. पण हे पैसे परक्याचे आहेत आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, अशी त्यांच्या आईची शिकवण होती. त्यांच्या आईमुळेच त्यांना वाचनाची सवय लावली आणि त्यानंतर महाराष्ट्राला एक हरहून्नरी लेखक पत्रकार मिळाला.

प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगडमधील पाली येथे झाला. अष्टविनायकमधील पालीचा गणपती त्यांचे कूलदैवत असल्याचा उल्लेख काही कागदपत्रात मिळतो. त्यांच्या जडणघडणीत वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. त्यांच्या आईने त्यांना स्वाभिमानाचे संस्कार दिले. एकदा त्यांच्या वडिलांना ल़ॉटरी लागली होती तेव्हा लॉटरी ७५ रुपयांची होती. पण हे पैसे परक्याचे आहेत आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, अशी त्यांच्या आईची शिकवण होती. त्यांच्या आईमुळेच त्यांना वाचनाची सवय लावली आणि त्यानंतर महाराष्ट्राला एक हरहून्नरी लेखक पत्रकार मिळाला.

2 / 7
 समोर दिसणाऱ्या अन्याया विरुद्ध पेटून उठणे. बंडखोर स्वभावाचा वटवृक्षासारखा बहरणारा हा माणूस जणू शंभर माणसांच आयुष्य जगला. चाकोरीत विचार करणं  त्यांना मान्यच नव्हत. एका चौकटीत राहून त्यांनी काम केलं नाही . वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलमध्येपुढचं शिक्षण नसल्यामुळे त्यांच शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली.  तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे  व्यवसाय त्यांनी केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ध्येयच होतं.

समोर दिसणाऱ्या अन्याया विरुद्ध पेटून उठणे. बंडखोर स्वभावाचा वटवृक्षासारखा बहरणारा हा माणूस जणू शंभर माणसांच आयुष्य जगला. चाकोरीत विचार करणं त्यांना मान्यच नव्हत. एका चौकटीत राहून त्यांनी काम केलं नाही . वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलमध्येपुढचं शिक्षण नसल्यामुळे त्यांच शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली. तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे व्यवसाय त्यांनी केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ध्येयच होतं.

3 / 7
सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते प्रबोधनकारांनीसार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्धतीची  नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचेच होते.

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते प्रबोधनकारांनीसार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्धतीची नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचेच होते.

4 / 7
साहित्य :  ‘वक्तृत्वशास्त्र’ (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं.  खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्याआधीही त्यांनी ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास ’ (१९१८) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही.‘माझी जीवनगाथा ’ हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय.

साहित्य : ‘वक्तृत्वशास्त्र’ (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं. खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्याआधीही त्यांनी ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास ’ (१९१८) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही.‘माझी जीवनगाथा ’ हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय.

5 / 7
 संयुक्त महाराष्ट्र:  संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट प्रमुख नेत्यांमध्ये होते. मुंबई खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नानेच महाराष्ट्राला मिळाली.

संयुक्त महाराष्ट्र: संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट प्रमुख नेत्यांमध्ये होते. मुंबई खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नानेच महाराष्ट्राला मिळाली.

6 / 7
२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. आणि एक ज्वलंतशिल लेखणीला पुर्णविराम लागला. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली.

२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. आणि एक ज्वलंतशिल लेखणीला पुर्णविराम लागला. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली.

7 / 7
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.